काल अंधार्या रात्री
होती एक कविता सुचली
पण सकाळी एक बातमी कळली
अन लेखणी माझी दुसरीकडेच वळली
नियतीचा खेळ बघा
किती विचित्र आसतो
एका गोष्टीची आमिष दाखवून
तारजोड दुसर्या मध्ये करायला लावतो
मन हे हळवा आपला,किती अपेक्ष्या ठेवतं
त्याचा तरी कुठं चुकतं
केलेल्या कामाचा फळ, वेळेवर मिळावा
एवढच त्याला वाटतं
पण
का हवं ते मिळत नाही ?
अन
का मनाला कळत नाही ?
ताण घेण्यात आता अर्थ नाही
का तो हे मानत नाही ?
आता मला समजत नाही
दोषी कुणाला ठरवायचा ?
नशिबाच्या नावाने खडे फोडायचा ?
कि आपलंच चुकलं म्हणून शांत बसायचा .....
नशीब आहे तरी काय ?
हे मला आहे जाणायचं
येशील का माझ्या सोबत
आहे त्याला विचारायचं .
कुणीतरी म्हणे कि पदोपदी नशीब
कसोटी पाहत आसतं
जितका आपण लढावं
तितकाच ते लढवत आसतं
आता मी ठरवलंय
नशिबा सोबत लढायचं
न देता ध्यान ह्या अश्या गोष्टींवर
काम आपला करायचं
लक्ष्य केंद्रित करून कामावर
आहे मला नशिबावर विजय मिळवायचं
आहे मला नशिबावर विजय मिळवायचं
सुधाकर -- तारीख १८ डिसेंबर २००९
Thursday, December 17, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment