Sunday, October 3, 2010

कधी होईल आपल्यांना भेटणं

मासान मागून मास गेले
दिवसान मागून दिवस गेले ,
आपल्यान वाचून सगळे
आता सनं हि साजरे केले

पहिला मी तो बर्फ
बर्फाचं ते वितळणं ,
पहिली ती फ्रोझनं नायगरा नदी
पाहिलं तिचं सुसाट ते वाहणं ,
सांभाळलेला बर्फाळ दुख घेऊन
एकदाचा तिच्या erie lake ला जाऊन मिळणं

पहिली मी ती हीरवळ
झाडा वरचं हिरवं ते पानं,
पाहिलं पानाचं रंग बदलणं
मौसम नुसार त्याचं स्वतःला बदलून घेनं,
पाहिलं त्याचं ते फंधीपासून तुटनं
अन रोज दुरूनच पाहत आसलेल्या धरतीला,
एकदाचं खाली येऊन भेटणं

पहिला इथला प्रत्येक गाव
केला अख्खा अमेरिका भ्रमनं,
पण
पण न राहावे आता इथे ,
आता रमेना वेडं हे मनं,
माझ्या देहाला इथेच ठेवूनं
येतो तो रोज जुन्नी, नायेगावी फिरूनं

आसतं झोपेचं रोज रुसणं
पोटाचं तर जणू पिढ्यान पिढ्यांचं भांडण
नको वाटे हे आसं वागणं
सगळ्यांत असूनही एकटा एकटा जगणं

देवा चरणी एकच आहे विचारनं
देवा तुझ्या ह्या बाळाला सांग नं
कधी होईल आपल्यान सोबत बोलणं
बोलतांना मनसोक्त हसणं
कधी होईल आपल्यांना भेटणं
साठलेला दुख सगळं भेटता क्षणीच विसरणं

सुधाकर पाटील
तारीख : ऑक्टोंबर ३ २०१०

Thursday, September 23, 2010

बायको

आता पर्यंत मावशी , मामा , काका आत्या ह्या सगळ्या पाहुण्याच्या मुला मुलींचे लग्न लावले, मित्रांच्या लग्नामध्ये बिनधास्त नाचलो , मनसोक्त खाल्लं. नवरा नवरीच्या हसण्यावर , त्यांच्या लाजन्यावर , आपण चिडवल्या नंतर मनातून लाजून पण वरून हसण्यावर खूप हसलं. उखाण्यातून नाव घेण्यासाठी केल्याल्या आग्रह मुले परेश्यान झालेल्या नवरा - नवरी कडे पाहून स्वतः खुश
झालो. एकंदरीत दुसर्याचा लग्न म्हणजे आपली माज्याच माज्या करून घेतली . तेंवा कधी विचारही आला न्हवता कि त्या वधू वर जोडी वर किती दडपण आहे.
पण
पण जसं जसं लग्न जवळ येत माझं दडपण वाढत चाललाय . लग्न म्हणजे नेमकं काय आसतं ह्याचा मी विचार करू लागलो , आपली जोडीदार म्हणजे कोण आसते. तिच्या बद्दल आपल्या काय जबाबदाऱ्या आसतात ह्या विचारांनी दोख्यात घोड दल स्थापन केलाय. टिळा, कुंकू, लग्न, जोडीदार, बायको हे सगळे म्हणजे नेमकं काय. ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय, त्यांच्या महत्त्वाचं महत्व काय ? सगळ्या .. सगळ्या गोष्टी मला आता कुठं समजायला लागले नवे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता केल्या जात आहेत . हे गोष्टी आपापले दल करून डोक्यात आता सज्य होत आहेत. त्यातच कुठून तरी रोज एक गोष्टीचा उलघडा होत आहे , कुठून तरी आवाज येत आहे. आणि सांगत आहे अर्थ प्रत्येक गोष्टीचा. त्यातच काल एक आवाज आला ऐकण्यात आलं बायको म्हणजे काय ........... बायको म्हणजे काय असते ,

बायको म्हणजे सखी असते , बायको म्हणजे सोबती असते ,
बायको मैत्रीण असते , पण मैरिणी पेक्ष्या आई ज्यास्त असते
दिवान खाना कमी असतो पण देऊळ ज्यास्त आसतं
खरं तर बायको म्हणजे एक बंदर आसतं नवरा नावाच्या गालाबत्ता साठी
हे गलबत शिरा उभारून, निधड्या छातीने , साता समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडतं
या दर्यात शिरावं ... , दूर वरचे किनारे पहावे.......,
वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा .......,
संतप्त लाथांची मस्ती अंगावर घ्यावी ........,
ह्या दर्या च्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन जगावं ...
जगणं असं असावं कि पावुला पावुला वर मरणाशी मुलाखत व्हावी.... ,
आसं आणि ह्याहून हि कठोर निर्न्नय घेहून, दुर्दम्य इच्छेने समुद्रात जातो
पण हे सारे उद्रेक अंगावर घेत असतांना गलबत सतत पाहत असतं ते आपल्या बंदराकडे
पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव ते दोन्ही घेऊन येतं ते आपल्या बंदरामध्ये
आणि तिथ प्रशांत पायाच्या गालिच्यावर विश्रांत होतं
गलबताच्या पराक्रमाचा उत्सव हि बनदरात
त्याच्या पराभवाच्या जखमावर मलम हि बंदरातच ......

काय माहिती असे आवाज मला कुठून तरी आताच का ऐकू येत आहेत. मला वाटते अश्या आवाजाने एक एक दल साज्य होत आहेत पुढचा पावूल टाकायला मला साज्य करत आहेत.

सुधाकर पाटील
तारीख २३ सेप्टेम्बर २०१०

Sunday, August 29, 2010

मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पुन्हा एकदा जावसं वाटतं मैदानात
पुन्हा एकदा भिजावंसं वाटतं पावसात
पुन्हा एकदा खावंसं वाटतं कांदा भाजी
पुन्हा एकदा माखवसं वाटतं जिलेबी ताजी
कांदा भाजी खातांना, जिलेबी ताजी मखताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पाणी असेल टपकत तुजया अलकांतून
खेळत असेल ते गालफटाच्या खळीतून
एक थेंब बसला असेल तुज्या ओठावर
घेशील त्यास आत, जगत असेल तो त्या आशेवर
केसांत पाणी खेळताना, ओठाशी पाणी बोलताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

वाहत आसतील धो धो पावसाच्या सरी
येत आसतील खालच्या वाड्याच्या दारी
सोडत आसशील त्यात तू कागदाच्या ओढी
करत आसतील त्या ब्राम्हदाच्या वारी
सरी दारात येताना, ओढी त्यात सोडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

इथं अंबरात कडकडत्या विजा जेन्वा थरारक जमकतात
नेमकी तुझ्या वूनिवेची जणू जाणीव करून देतात
माझ्या सारखाच आभाळाहि त्यांचा खूप राग येतो
मला समजावताना माझ्या पेक्ष्या तोच रडून निघतो
नाही होत सहन आता , बघून आक्ख अंतराळ रडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

सुधाकर पाटील
तारीख : २९ ऑगस्ट २०१०

Thursday, August 12, 2010

एक मैत्रीण !!

इथ नं मला
एक पोरगी भेटली

आधी नं जराशी
ती नाटकीच वाटली

सुरुवातीला नं ती
जरा ज्यास्तच थाटली

पण आता आमच्या दोघांची
फ्रिक्वेन्सीच पटली

पण तिच्या नाकावर
भलताच राग
चष्म्याने खाला नाकाचा
आर्धा भाग

दोन गोष्टी ती
सतत सोबत घेऊन फिरते
कुणास ठाऊक येव्हाडा वजन
नाक कसं सहन करते

आहे दिसायला
जराशी ती सावळी
पण मानाने आहे
ती खूपच हळवी

जितकी आहे ती
दिसायला बारकी
तितकीच दिसेल
तुम्हाला ती बोलकी

पण सगळ्यांनाच ती
नाही हो बोलत
सगळ्यांनाच आपलासा
नाही हो ती करत

मोजकेच तिचे मित्र आसतात
पण जे आसतात ते पक्केच बनतात

मित्र कुणाला बनवायचं ...
हक्क ह्याचा
फक्त तिलाच आहे
मी पण तिचा मित्र ...
आनंद ह्याचा
मला मात्र खूपच आहे

सुधाकर पाटील
तारीख : २६ जुलै २०१०

ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव !!

काही केल्या आता वेळ माझा पळेना
गेले कसे दोन महिने मला ते कळेना
खालील भावना तुला बोलल्याविना
चष्मा, मला आता राहवेना

गेली माझी मैत्रीण,
विचार करूनच डोकं माजं ठणकतं
गेली कुठे तुझी मैत्रीण
रोज रोज मला रोज ते विचारतं
नाहीयेस तू इथे ,
विचार करून वस्तुस्तीचा, परत भानावर येतं
माझ्याशी बोलतं आणि हळूच म्हणतं

आयुष्याच्या प्रवासात
मानसं भेटतात आणि दुरावतात देखील
नाती जुळतात आणि तुटतात देखील
ओळखी वाढतात आणि विसरतात देखील
आठवणी रंगतात आणि पुसतात देखील
मैत्री करतात आणि तोडतात देखील

पण आसे आपले म्हणणारे जेम तेमच भेटतात
बिना श्याई च्या लेखणीने आखी डायरीच लिहून काढतात
एकच आहोत आपण आसं ओराढू ओराढू सांगतात
आणि आपल्या डायरीचा एक ते भागच बनतात

त्याच डायरीतला तू एक पान बनली आहेस
जशी आहेस तशी खूप छान आहेस

जवळची मैत्रीण म्हणनार्या पैखी मला तू भेटली
थोड्याच दिवसात आपण आपली सुख दुख वाटली
आठवणी आपल्या मैत्रीचे एका कोपऱ्यात साठली
तू जाताना मात्र माझी कंठ दाठली

जाता जाता माझी एकच विनंती करतो
विनंती कसली तुझ्या समोर माझा ते हक्कच बनतो
आयुष्यात तुझ्या ह्या मित्राची हमेशा आठवण ठेव
ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव
तुझा मित्र सुधाकर

Thursday, July 29, 2010

परदेश्यातला एकटेपणा

काल सकाळ मध्ये ब्लोग वाचला "परदेश्यातला एकटेपणा" अनेकांचे परदेश्यातल्या एकटे पानाचे किस्से सांगितले, सगळ्यांनी सुखद अनुभवा पेक्ष्या दुखद अनुभवच मांडली, ते सगळा वाचून वाटला खरच असेल का ते सगळा, खरच आस झाला असेल का एकटेपणा तसा ? त्यांच्या जीवनात आस झाला असेल वा नसेल पण हे सत्य आहे.

इथं निसान कार मध्ये फिरताना मला आठवण येते ते माझ्या आपाची ची, इथं हेलीकॉपटर ने ग्र्यांड कॅनोन फिरताना मला आठवण येत होती ती आपल्या सह्याद्री ची, (वाटत होता आपल्या राजेंच्या राज्यात जर आस प्रदेश आसला आसता तर राजे इथं कश्या प्रकारचा गडकोट बांधले आसते), रोज नको वाटून सुधा २*२ $ ची कॉफी पिताना आठवण येते ती आपल्या टपरीवरच्या चहाची .... इथले हॉट डॉग चे स्टोल्स बघितल्य्वर तोंडाला पाणी सुटते ते वडापाव , मिसळपाव च्या आठवणीने, इथला बर्गर खाताना आठवण येते ती आल्या ज्वारी च्या भाकरीची, फिरताना आठवण येते ते मैत्रिणीसोबत खालेल्या पाणीपुरीची, ........अन रोज हाताला चुटका बसला कि आठवण येते ते .............. आई ची ......
मग का यावा इतक्या दूर ?, का करावा एवढा मोठा उठाठेव ? .... काय तर म्हणे पैश्या साठी , काय पैसाच सर्व काही आहे ? , काय पैसा तिथे बसून नाही कमवू शकत आपण ? , आणि नाहीच कमावला तर नाही का चालणार ?????..........
अभिमानाने पाठ थोपवणारे बाबा तिकडे , मायेने हात फिरवून सगळा ताण घालवणारी आई तिकडे , प्रेमाने साद घालणारी पाटलीन बाई तिकडे ... आणि सदैव सोबत राहणारे , सदैव साथ देणारे माझे मित्र तिकडे ....मग मग मी काय करतो इकडे ?? , का आहे मी इकडे ? कश्या साठी आहे मी इकडे ? .....
घरी दादाला मुलगा झाला म्हणे पण मी नाही बघू शकत , शेतात बोर ला पाणी लागला म्हणे पण मला नाही दिसत, गावातल्या शाळेतले मुला पाटलाची वाट बघतायत पण मी नाही जाऊ शकत, आहो मित्रांचे लग्न होतायत पण मी नाही जाऊ शकत... , लग्नात वाजणाऱ्या ब्यांड ने आमचे पाय इथं थनथनतायत पण मी नाही नाचू शकत, बहिणीची मुलगी बोलायला शिकालीये मामा मामा म्हणतीये पण प्रतेक्ष्यात मी नाही ऐकू शकत .........मग का मी खुश होयायचा ? .... इथला इन्फ्राष्ट्रकचर पाहून ?, इथला बर्फ पाहून ? का इथल्या गर्मीत फिरणाऱ्या आर्ध्या उघड्या पोरी पाहून ? , का फक्त आणि फक्त आकाउंट मधला वाढत चाललेला ब्यालेन्स पाहून ....?

बर्याच गोष्टींचे उत्तर मी शोधत आसतो पण मला उत्तर नाहीच सापडत ..... पण कधी कधी वाटतं आयुष्यात काही करायचा असेल तर आशे कठीण दिवस बघावेच लागतील .... ते UP बिहारचे लोक १००-५० रुपयाच्या मजुरी साठी आपला प्रदेश सोडू शकतात मग आपण का नाही सोडू शकत , मग आपण का दूर नाही राहू शकत, ह्याला होमेसिक नेस तर नाही न म्हणत ? .....................
पण नाही ते UP बिहारचे लोक १००-५० रुपयाच्या मजुरी साठी आपला प्रदेश सोडला आणि आम्ही २००-१०० डॉलर साठी आमच्या माती पासूनच दूर आलोय ,....... नको नको नको हे होणे नाही, हे आम्हास शक्य नाही , आम्ही आलो काही कामा साठी , राजेंचा एक सरदार बनून , करू आम्ही लवकरच काम फत्ते आणि परतू आम्ही लवकरच अमुच्या मायदेशी , आमच्या मातीत पुन्हा खेळू , मायेश्या कुशीत पुन्हा झोपू , सह्याद्रीच्या कड्यावर बेधुंध पुन्हा फिरू , मित्रान सोबत पार्टी ला पुन्हा बसू , बाल मित्रान सोबत पुन्हा हासू, आणि पाटलीन बाई सोबत खोटा खोटा पुन्हा रुसू ,

तुमचा
सुधाकर पाटील
तारीख १५ जुलै २०१०

Saturday, May 15, 2010

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत !!

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत
प्रेम.....
खूप ऐकला.. खूप वाचला हो प्रेमाबद्दल
पण लिहिण्याचा योग कधी आलाच नाही
वळली जरी लेखणी ..... तरी ती थांबायची.... आणि सांगायची .....
तू कसा लिहिशील रे प्रेमाबद्दल,
कारण तुला तर त्याची जाणीवच नाही

पण
आज मला थोडासा लिहायचय
प्रेमाबद्दल आता मला काय वाटतं.. आज जगाला ते सांगायचय

प्रेम म्हणजे काय असतं
आहो ज्यांना होता त्यानाच कळतं
भनक नहीं प्रेमाची,
त्याना मात्र
कवितेचा फक्त एक, विषय बनुन रहातं

प्रेमाला आनंत रूप
प्रेमाला आनंत रंग
जे खेळतात प्रेमाच्या रंगात
ते होतात बेदुन्ध
ज्यांनी नाही घेतला प्रेमाचा गंध
त्यांना काय माहिती प्रेमाचा सुगंध

आता पर्यंत खुप काही वाचण्यात आला
प्रेमाबद्दल खूप काही ऐकण्यात आला
पण
प्रेम काय असतं हे आता माला समजतय
कारण गोड तो प्रकार, आता माला होतंय
आणि प्रेमात होनाऱ्या गोडीचा आनंद
आता मी ते आनुभाव्तोय :) ....

खऱ्या मैत्री चा अर्थ
प्रेमातच कळतं
सोज्वळ नात्याचा महत्व
प्रेमातच उमजता

शुल्लक करणावर वाद
प्रेमातच होतात
निरर्थक गोष्टीवर हसण्याचे प्रकार
प्रेमातच चालतात

विषय नसताना पण, तासान तास
प्रेमीच बोलतात (सध्या तरी फ़ोन वर )
छोट्याश्या गोष्टीवर पण बडबड
प्रेमीच करतात

काही न बोलताच, बरच काही बोलून
प्रेमातच जातं
कही न ऐकताच, बोलण्याचा अर्थ
प्रेमातच समजतं.

आपलं कुणी जवळ असण्याचा आनंद
प्रेमातच फूलता,
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .

सुधाकर पाटील
तारीख 15 मे २०१०

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत !!

प्रेम म्हणजे काय असतं - आमच्या शब्दांत
प्रेम.....
खूप ऐकला.. खूप वाचला हो प्रेमाबद्दल
पण लिहिण्याचा योग कधी आलाच नाही
वळली जरी लेखणी ..... तरी ती थांबायची.... आणि सांगायची .....
तू कसा लिहिशील रे प्रेमाबद्दल,
कारण तुला तर त्याची जाणीवच नाही

पण
आज मला थोडासा लिहायचय
प्रेमाबद्दल आता मला काय वाटतं.. आज जगाला ते सांगायचय

प्रेम म्हणजे काय असतं
आहो ज्यांना होता त्यानाच कळतं
भनक नहीं प्रेमाची,
त्याना मात्र
कवितेचा फक्त एक, विषय बनुन रहातं

प्रेमाला आनंत रूप
प्रेमाला आनंत रंग
जे खेळतात प्रेमाच्या रंगात
ते होतात बेदुन्ध
ज्यांनी नाही घेतला प्रेमाचा गंध
त्यांना काय माहिती प्रेमाचा सुगंध

आता पर्यंत खुप काही वाचण्यात आला
प्रेमाबद्दल खूप काही ऐकण्यात आला
पण
प्रेम काय असतं हे आता माला समजतय
कारण गोड तो प्रकार, आता माला होतंय
आणि प्रेमात होनाऱ्या गोडीचा आनंद
आता मी ते आनुभाव्तोय :) ....

खऱ्या मैत्री चा अर्थ
प्रेमातच कळतं
सोज्वळ नात्याचा महत्व
प्रेमातच उमजता

शुल्लक करणावर वाद
प्रेमातच होतात
निरर्थक गोष्टीवर हसण्याचे प्रकार
प्रेमातच चालतात

विषय नसताना पण, तासान तास
प्रेमीच बोलतात (सध्या तरी फ़ोन वर )
छोट्याश्या गोष्टीवर पण बडबड
प्रेमीच करतात

काही न बोलताच, बरच काही बोलून
प्रेमातच जातं
कही न ऐकताच, बोलण्याचा अर्थ
प्रेमातच समजतं.

आपलं कुणी जवळ असण्याचा आनंद
प्रेमातच फूलता,
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .
विरहात होणारा दुख
प्रेमिलाच जाणवतं :( .

सुधाकर पाटील
तारीख 15 मे २०१०

Thursday, May 6, 2010

Bayko

बायको मैर्तीन आसते, पण मैरिणी पेक्ष्या आई ज्यास्त आसते
दिवान खान कमी आसते पण देऊळ ज्यास्त आसता
खरतर बायको म्हणजे एक बंदर आसता नवरा नावाच्या गलबत साठी
हे गलबत शिरा उभारून , सात समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडता
या दर्यात शिरावा , दूर वरचे किनारे पहावे ,
वादळ वार्याशी मुकाबला करावा
संतप्त लाथांची मास्ठी अंगावर घ्यावी
जगणा आस आस्वा कि पौला पौला वर मरणाची मुलाखत व्हावी
पण हे सारे उद्रेक अंगावर घेत आसताना गलबत सतत पाहत असता ते आपल्या बंदर कडे
पराभवाच्या झाखामा आणि विजयाचे उठसाव ते दोन्ही घेऊन येत ते आपल्या बंदर मध्ये
आणि तिथ प्रशांत पायाच्या गालिच्यावर विश्रांत होता
गलबताच्या पराक्रमाचा उत्सव हि बनदरात
त्याच्या पराभवाच्या जखमावर मलम हि बंदरातच

Tuesday, April 20, 2010

न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा

न राहिलो मी माझा
आता झालो मी कुणाचा !
आता कळलं मला
असाच आहे हा, रोग प्रीतीचा !!

एकटाच प्रवासी मी
प्रवास जीवनाचा ऐकताच करायचो ,
फुल काट्यांची वाट
आतापर्यंत एकटाच चालायचो !
पण अचानक माझ्या जीवनाची वाट ..
जणू स्वर्गाकडे वळली ,
पाऊलावर पाऊल ठेवणारी मला ..
पाटलीन बाई जे मिळाली .

वाटतं....,
कधी एकदा फोन, येईल तिचा
अन कधी एकदा मी, तिच्याशी बोलू
हृदयात साठवलेले गुणगान तिचे
कधी एकदा तिच्या समोर, बहाल करू

मधुर बोल तिचे जेन्वा
माझ्या कानावर पडतात ,
कानापासून थेट ते
काळजात शिरतात ,
आस वाटतं काळजात, मोठासा
खोपा करावा
प्रत्येक शब्द तिचा, त्यात साठवावा

कसं असतं नं......
दोन उन्हाड पाखरं ..
दोन वेगवेगळ्या दिश्यानी उडत होते ,
आप आपल्या ध्येय प्राप्तीसाठी ..
उंच भरारी मारत होते ,
परमार्थ कृपेने दोघांची भेट झाली
आता ध्येय हि एक, आणि दिश्या हि एक झाली .

वाटतं जीवनात पुढे जाण्यासाठी
आता दोनच गोष्टीची गरज आहे ,
डोक्यावरून हात मायेच्या ममतेचा ...
पाउलो पाऊली साथ सखीच्या प्रीतीचा ..
पाउलो पाऊली साथ सखीच्या प्रीतीचा ..
न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा !!!!!!
न राहिलो मी माझा , आता झालो मी कुणाचा !!!!!!


सुधाकर पाटील
तारीख : २० एप्रिल २०१०

Wednesday, March 17, 2010

आसाच आहे मी

असाच आहे मी
सगळ्यांत मिळून राहणारा
मनात कितीही दुख आसला तरी
चेहऱ्यावर हास्य फुलवणारा

नवीन लोकांना पण जवळ
लवकर मी करत आसतो
नातं एक तयार करून
आपलासा त्यांना बनवत आसतो
आसाच आहे मी
नात्यांत गुंतून राहणारा
कष्ट स्वतःला लागले तरी
नात्यांना जोपासून ठेवणारा

बोलना ज्यास्त बारा नसतं
लहानपणी मास्तरांनी सांगितला होतं
मी तरी काय करू
मला हि ते काळतं पण कधी नाही वळतं
आसच आहे मी
बोलत नुसता राहणारा
कंटाळत समोरचा आसला तरी
बडबड आपली चालूच ठेवणारा :)

एका गोष्टी सोबत माझा ज्यास्त खटकतं
खोटं कुणी बोललं तर डोकं आपला सनकतं
खोटं कधी खपून मी घेत नसतो
हो पण खोटं बोलल्या शिवाय
नासका कान्धा कधी विकत नसतो
आसाच आहे मी
खोटा खपून न घेणारा ,
खरं ते बोलून
समोरच्याला दुखावणारा

ह्या समाजात आलो मी
मला वाटता समजासाठी काही करावा
ह्या समाजाचं देणा लागतो मी
सामाजिक कार्य करून, ऋण ते फेडाव
आसाच आहे मी
नेहमी समाजाचा विचार करणारा
स्वतः अडचणीत असलो तरी
दुसर्यांच्या मदतीसाठी धावणारा

आसाच आहे मी
खूपच कुणाला आवडणारा
तर खरं बोलण्याच्या स्वभावामुळे
कुणाच्या डोक्यात बसणारा
जसा आहे तसा आहे मी
ह्यात आता बदल होणे नाही
कुणाच्या आवडी न आवडीने
स्वतःला बदलेने,
मला हे पटत नाही.

सुधाकर पाटील
तारीख : १७ मार्च २०१०

Tuesday, February 2, 2010

अन आई लगेच तुझी आठवण होते !!

लाख आठवणी बांधून मनाच्या गाठी
निघालो मी स्वप्नांच्या पाठी
मन कचरते पावूल अडखळते
अन आई लगेच तुझी आठवण होते

खूप आवडता म्हणून, जेवताना
गरम गरम पोळ्या तू लाटायचिस
रोज अखेरची पोळी तिळाची, करायला
कधी नाही तू विसरायचीस
आता पोळी काय आसते हेच मी विसरतोय
पाच्यात्या फूड नेच पोट माझा भारवतोय
इथला पिझ्झा बर्गर खाताना , जीभ माझी रडायला लागते
अन आई लगेच तुझी आठवण होते

रोज जाताना शाळा कॉलेज ला,
ब्याग माझी तू भरायचीस
राहिला काही विसरून तरी,
धावत येवून ब्यागेत ते ठेवायचीस
इथं निघताना घाईत ऑफिस ला
काही न काही मझ्याकडनं विसरून राहते
अन आई लगेच तुझी आठवण होते.

रोज बाहेरून आल्यावर
आज काय बनवायचा विच्यारायचीस,
अन रोज नवीन नवीन प्रकार
जेवणात तू बनवायचीस,
मी पण रोज नवीन प्रकाराची मागणी करायचो
तुला होणार्या त्रासाचा विचार न करता
मनसोक्त ते हादडायचो
कांदे कापताना इथे स्वयपाकासाठी डोळ्यातून पाणी येते
अन आई लगेच तुझी आठवण होते

आई किती ग माज्या प्रकृतीला तू जपायचीस
दुखला डोकं थोडासा तरी तासंतास चेपायचीस
इथल्या थंडी ने डोकं रोज ठणठणते
अन आई लगेच तुझी आठवण होते

सकाळी उठल्यापासून धावपळ माझी सुरु होते
रात्री झोपे पर्यंत प्रत्येक क्षण, तुझ्या उनेवेची जाणीव करून देते
मग हळूच मनाला माझ्या एक कल्पना सुचते
तुला एक फोन केला कि सगळा काही सुरळीत होते

बघता बघता दिवस सरतील
दिवासंसोबत कामही संपतील
आई लवकर कामं आटपेन मी
आणि लवकर च तुला भेटेन मी

कधी कधी वाटता सगळा हे सोडावं
सरळ येऊन कुशीत तुझ्या पडावं
तुझ्या पायाजवळ माफी मागावी
तुज्या पासून दूर जाण्याची पुन्हा चुका न करावी
पण....
पण
"जीवनात पुढे जाण्यासाठी
बर्याच आवघड गोष्टीना सामोरे जावा लागते
आठवणीना विसरावे लागते
मनाला कठोर बनवावे लागते
भावनांना आपल्या मारावे लागते
काळजाला पालथा पाडावे लागते
जिभेची ची चव घालावी लागते
आश्रुना डोळ्यातच साठवावे लागते
चेहऱ्यावर हास्य फुलवावे लागते
नकोसे वाटणार्यांना पण जवळ आणावे लागते
आणि जवळच्यान पासून दूर जावे लागते "
अमेरिकेसाठी निघताना बोललेले ते तुझे वाक्य
कानात माज्या नेहमी गुंजते
अन आई लगेच तुझी आठवण होते
अन आई लगेच तुझी आठवण होते

सुधाकर पाटील
तारीख ०२ फेब्रुवारी २०१०

Sunday, January 3, 2010

हे नव वर्षा साथ माझी तू देशील का ?

कधी वाटतं उंच आकाशी उडावं
तर कधी वाटतं चंद्रावर च घर बांधावं
कधी वाटतं इथल्या बर्फात बिना ज्याकेट चा फिरवा
तर कधी वाटतं हिमालया वरच जाऊन राहावा .... (बायको सोबत हं :) )

कधी वाटतं इथल्या फ्रोजन नदी वर कब्बड्डी चा खेळ मांडवा
तर कधी वाटतं सागरातल्या शार्क बाई सोबतच नाचावं ... ( ते हि मराठी लावणीवर)
कधी वाटतं इथल्या हरिणान सोबत दोव्ड करावी
तर कधी वाटतं वाघाच्या तोंडात हात घालून दातच मोजावे

कधी वाटतं स्वप्ना पाहणं सोडावं
तर कधी वाटतं स्वप्नातल्या 'ति' ला प्रतेक्ष्यात च भेटावं
कधी वाटतं रोज लंच अमेरिकेत तर
डीनर घरच्यांसोबत भारतात करावं
तर कधी वाटतं घरचा सगळा बारदान
आत्ता इथं अमेरिकेत च घेऊन यावं

उंच आकाशी उडण्याच्या
गप्पा मी करत आसतो
पण निवळ आळस करून
पंख कापल्या वाणी मी बसत असतो
झटकून आळस माझ्यातला
नव चैतन्य माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

हरिणाच्या सोबत दोव्ड करण्याची
इच्या मी बाळगत असतो
पण आत्मविश्वास हरवून
पाय मोडल्या वाणी मी बसत असतो
स्वतःवर विश्वास ठेऊन समोर पळण्याचं बळ माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

शार्क सोबत खेळण्याच्या आन
वाघाच्या तोंडात हात घालण्याच्या
बाता मी मारत आसतो
पण हिम्मत खचून
हात तुटल्या वाणी मी वागत आसतो
भीती माझ्यातली घालवून
मोठ्या अडचणींना समोर जाण्याचा सामर्थ्य माझ्यात तू आणशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

जीवनात माझ्या, बर्याच गोष्टी मी साध्य केल्या
पण काही तश्याच रखडून राहिल्या
रखडलेल्या कामांना मार्गी तू आता लावशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

आयुष्यात काही मिळवो न मिळवो मित्रांना मी जमवला आहे
मित्रत्वाच्या धाग्याने मित्रांची माळ मी ओवली आहे
गाठ आमच्या मैत्रीची दिवसेनदिवस घट्ट बांधून
माझ्या सोबत त्यांच्या इछ्या पण पूर्ण तू करशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

हे नव वर्षा .....
ह्या आभाळा एवढ्या आकांक्षा माझ्या
त्यातल्या काही तरी तू पूर्ण करू शकशील का ?
नव वर्षा साथ माझी तू देशील का ?
मदत माझी तू करशील का ?

सुधाकर पाटील
तारीख ३ जानेवारी २०१०

Saturday, January 2, 2010

कोण म्हणे कि अमेरिकेत जाऊन भारतीय माणुसकी विसरतात

अमेरिकेला येण्याची तारीख आली आणि थोडी भीती वाटत होती , वाटत होता, तिथ कुठ राहायचा , कसा राहायचा , बरं कसा राहायचा ते तिथ गेल्यावर बघू पण आधी तिथ जायचा कसा. माझी इमान सुटून गेली तर ? , इमान्तालावर माझ्या ब्यागा पास नाही झाल्या तर ?, तिथल्या इंग्रजी लोकांनी काही इच्यारलेला मला बोलता येईना गेला तर ? मला काही अडचण आली तर ? , येवडाच नव्हे तर मला हे पण वाटलं होता कि मी अमेरिकेला जाणार्या इमानात बसायचा सोडून अफगाणिस्थान ला जाण्याच्या इमानात बसलो तर (खरच बर्याच वेळेस मी नांदेड पुणे च्या ऐवजी नांदेड नाशिक त्रावेल्स(बस) मध्ये बसलो आणि नांदेड बाहेर आल्यावर जेन्वा समजला तेंवा पाटीलकी गाजून त्याला परत नांदेड मध्ये सोडायला लावला होता, ) तशी गफलत इथ झाली तर ? . ह्या सगळ्या 'तर' चे उत्तरांच्या परिणामांचा विचार करून माझा मन बधीर होत होता ( आहो इमानातून मला खाली फेकतील का इथपर्यंत पण मी इच्यार केला होता). पण तसा काही नाही झालं , इमानाचा टिकेट घेण्यासाठी जेन्वा traval department कडे गेलो तेंवा कळला कि आजून दोन माझे टीम मेट्स केतकी आणि नंदिता येतायत जे कि आधी २-३ वेळा अमेरिकेत जाऊन आलेले आहेत. हे ऐकून आधी सगळ्यांचे फोन क्रमांक , पत्ते १० जागी लिहून ठेवणारा मी आता फक्त त्या दोघींचे फोन क्रमांक लिहून घेतलो आणि एक मोठा श्वास घेतला वाटलं --------
"विठू माझा पंढरीचा नाथा | मज करपा केली आता|
मी ठरवला कि त्या दोघी जिकडे जातील तिकडे आपण जयायचा ( म्हणजे ते ज्या इमानात बसतील त्या इमानात आपण बसायचा ) . त्यांची मला बरीच मदत झाली. पहिल्यांदा आस झालं असेल कि प्रवासात मुलगा मुलीन वर अवलंबून आहे. कसा हि आसो एकदाचा आम्ही बफ्फेलो च्या इमान्तालाच्या बाहेर पडलो. त्या मला माझ्या हाटेलाची ची क्याब कुठं येती सांगितल्या, आणि जाशील न विचारून त्या गेल्या. त्यांना मी मोठ्या थाटाने म्हटला कि मी जायीन पण त्या जश्या गेल्या , आणि जसा हि मी एकटा पडलो तेंवा मात्र मला ३३ कोठी आठवत होते. माझ्या विठ्ठला ची आराधना केल्या विना मला राहवलं नाही हो..... पांडुरंगा .....
" देश सोडीला , गाव सोडीला | आता तूच सांभाळ रे विठला " .
तेवढ्यात माझ्या हाटेल ची क्याब आली , आणि एक जाड च्या जाड पोरगी ( आता तिला पोरगी म्हणावे का बाई हे नाही समजत ) आली आणि मला इंग्रजीत काही तर इच्यारली . मला काही कळला नाही तरी मी होकारार्थी मान हलवली आणि तसाच उभा राहिलो. मग ती बाईच ( पोरगी म्हटला तर अमेरिकेतल्या पोरींचा अपमान होईल हो ) माझ्या ब्यागा क्याब मध्ये ठेवली आणि मला हाटेल च्या दारात आणून सोडली आणि गायब झाली . मी वाट पाहत होतो कुणी येईल आणि सर सर म्हणून ब्यागा उचलेल , पण तसा झालं नाही , मीच ब्यागा घेऊन चेच्क इन केला आणि एकदाचा रूम मध्ये येऊन ठेपलो ( मला नंतर कळला , ती बाई माझ्या ब्यागा क्याब मध्ये ठेऊन माझ्यावर उपकार केली होती कारण इथ म्हणे सगळा स्वतःचा काम स्वतः करायचा आसता. (तसा आपण स्वतःचा काम स्वतःच करता हो पण जाऊ द्या ज्यास्त खोलात नको जाययला नाही का?)
२० तासाच्या प्रवासाने मी न थकता ह्या २० मिनिटांच्या प्रकारे मुळे थकलो होतो. हॉटेल च्या रूम मध्ये पडलो . वाटत होता मी इथपर्यंत आलो खरा पण , हे नवीन देश , नवीन लोक, नवीन गाव , मी एकता पडलो ह्या देश्यात ह्या गावात , कुठ जयायचा , कुठ राहायचा, आणि मुख्य म्हणजे काय खायायचा पुन्हा तेच प्रश्न पडत होते , वाटत होता
काहीच नाही मी | कोनिया गावीचा |
एकटा ठाई चा | ठाई एक |
तेवढ्यात माझी मैत्रीण प्रिया चा फोन आला , मला ती माझ्या प्रवास बदल विचारपूस केली आणि म्हटली " उद्या हापिस मध्ये मी तुझा डबा घेऊन येईन " , मला इतका छान वाटलं तुम्हाला सांगतो .. वाटलं आपण एकटे नाहीत, आपले मित्र , मैत्रिणी, टीम मेट आहेत आपल्या सोबत. माझ्या घाबरलेल्या सुधाकरच्या दुखी मनाला समजावून मी झोपलो .
सकाळी उठून हापिसला गेलो (ते पण एका भारतीय मुलाने मला हापिस पर्यंत नेऊन सोडला) . हापिसात आल्यावर सगळ्यांची ओळख झाली . सगळ्या इंग्रजी लोकांची पण ओळख झाली . सगळा आगदी वेगळा वाटत होता पण मस्त वाटत होता. कसं बस करत जेवणाची वेळ झाली आणि आम्ही लंच टेबल वर सगळे भेटलो . टेबल वर गेल्यावर कळला कि माझ्या साठी तर ३-४ लोकांनी डबा घेऊन आलेला . सगळ्यांच्या डब्याची चव घेतली . आणि चर्चे ला सुरुवात झाली . चारच्या म्हणजे काय तर मी हॉटेल मध्ये राहतोय हे काही बरोबर नाहीये . कुणी तरी मला adjust करून घ्यायला पाहिजे वगेरे वगेरे. खरच मला हॉटेल मध्ये राहावा वाटत न्हवता पण एव्हडाहि ताण नव्हता. मी एकता राहतोय हॉटेल मध्ये ह्याचा, माझ्या पेक्ष्या वायीट मित्रांना (अजून न झालेल्या मित्रांना - त्या वेळे पर्यंत माझा नीरज सोडून कुणी मित्र नव्हता ) वाटत होतं हे समजल्यावर मला खूप मस्त वाटला.
दुसर्या दिवशी मला पंकज आणि मोसिन ने त्यांच्या अपार्टमेंट मध्ये राहायला येण्यासाठी बोलावलं. मी त्यांच्या कडे राहायला गेलो . आस वाटत होतं मी पुण्यात राहतो , अमेरिकेत असून सुधा राहण्याचा आणि खाण्याचा ताण नाही म्हणजे किती मोठी गोष्ट आहे न . त्या १० -१२ दिवसात आमचा खूप जमायला लागला . मी पूर्ण पने फुकट राहून , फुकट चा खात फुकट च्या गप्पा मारत होतो (पाटलाच्या आवाजात ). मला मोसिन आणि पंकज तर सुध्या म्हणायला लागले ( मला सुध्या म्हटलेला खूप आवडता , आस वाटत कुणी तरी खूप जवळचा बोलावताय ) . पण १२ दिवसा नंतर मला एका अपार्टमेंट मध्ये जागा मिळाली. मी मोसिन, पंकज अपार्टमेंट मधून जाताना दोघेही म्हणत होते " हे १२ दिवस खूपचं मस्त गेले, आस वाटते तू इथच राहावा, आपण adjust करू"( offcource हेच वाक्य मोसिन ने मराठीतून तर पंकज ने हिंदीतून म्हटला) . मला हे ऐकून खूप छान वाटलं, छान ह्या बदल कि, त्यांनी मला तिथेच राहण्याची ऑफर दिली आणि त्यांनी ती ऑफर मला दिली कारण त्यांना माझा स्वभाव आवडला होता.
मी इथ येण्या आधी पासून तर इथ आल्या नंतर, ब्याग मध्ये काय काय आणायचा ह्या पासून तर इथ मोबायील/ल्याप्टोप घेण्यापर्यंत, बँक आकॉउंत ओपन कारे पासून तर SSN काढे पर्यंत जो हमेश्या मदत केला, तो म्हणजे नीरज. सुरुवातीला मोबयील घेणे वगेरे साठी सुप्रिया आणि गौरी ची मदत कामी आली. कमलेश, अरुण, नीरज च्या मदतीने मी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या , तर मोनिकाच्या मदतीमुळे मी apartment घेऊ शकलो.
मला कार रेंट करायचा होती , अरुण च्या मदतीने मी कार रेंट केली( हं कार वापस करण्यामागे कारण मात्र मस्त होता ते आसो ) आणि पहिल्याच वीक मध्ये आम्ही नायगरा फाल ला गेलो. ट्रीप मध्ये मी, कमलेश, पुरू , अरुण आणि पंकज होतो , ट्रीप मध्ये खूप मजा केली , आस वाटत होतं कि हे सगळे माझे कॉलेज चे मित्र आहेत , तेंवा पासून आमची मैत्री आहे. त्या दिवशी आम्ही पार्टी केली, मग काय नंतर पर्त्यान वर पार्ट्या वाढत गेल्या , आता तर मी माझ्या अपार्टमेंट पेक्ष्या ७-१०, २४-१२ मध्ये ज्यास्त पडलेला आसतो. अरुण आणि कमलेश ने बनवलेले नवीन नवीन चीकेन चे प्रकार ( चीकेन कोल्हापुरी सोडून ) तर पुरू ने बनवलेले स्वीट्स खात आसतो मध्ये मध्ये मोसिन आणि पंकज कडे पुरी , गाजर चा हलवा तर मी सोडताच नाही. आता मी माझ्या मित्रांच्या ५ ग्रीपूस मध्ये ६ व ग्रुप अद्द करायला हरकत नाही आस माझ्या मनाला सांगितला.
तसे काही प्रकार आसतात पण त्यांच्या वर आपणाला मात करायची आसते . हो मी जेन्वा आलो तेंवा आस वाटत होता कि सगळे माझ्या सोबत तर मस्त राहतात पण आपसात काही तरी प्रोब्लेम्स आहेत . आस वाटत होता रंग वाहिनी वरचा तो प्रोग्राम आसतो न बिग बोस तसा वाटत होता . पण मी ठरवला ह्या गोस्तीन कडे दुर्लक्ष करायचा . पण ऑफिस नंतर पण तोच तोच विषय ऐकल्यामुळे मला वैताग यायचा . मग एका पार्टी मधी मी सांगितला मित्रहो करपा करून त्या गोष्टी इथ काढायच्या नाहीत मग काय तेंवा पासून दुसर्यांबद्दल काही निघत नाही. अखेरीस आपण ठरलो भारतीय , भारतीय म्हटला तर हळवे असणारच , आपल्याला आपण काय नाही करतो ह्या पेक्ष्या तो /ती काय करते ह्यावर ज्यास्त भर देण्याची सवय. पण मला वाटते सगळी कडे काही न काही कारणाने दुखी आसन्या पेक्ष्या काही न काही कारणाने सुखी राहायला काय हरकत आहे . सगळे म्हणतात be +ve पण मला वाटते be +ve take +ve and try to give +ve , आता समोरचा कसा असेल ह्याचा तुमच्यावर परिणाम होईल का सांगा बरं . जर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानी ठेवल्या तर मात्र इथ सगळा एकदम मस्त.
इथे दिवसा कसे जातात हे नाही समजत , दिवसभर ऑफिस , ऑफिस हून आल्यावर कामुनीटी सेंटर मध्ये गेम्स खेळणे , दररोज न चुकता जिम ला जाने , सुट्टीच्या दिवशी कधी एकाच्या घरी जेवण तयार करून खाणे, कधी कुणासाठी शॉपिंग करायला जाने, कधी मोसिन च्या रूम वर मोठ्या प्रोजेक्टर च्या पडद्यावर वर मुव्ही पाहणे , तर कधी प्रिया, श्वेताच्या घरी पत्त्यांचा डाव मांडणे, सगळी कडे बर्फच बर्फ असल्याने जाता येत बर्फात बर्फाने खेळणे, प्रत्येक वेळी पुरू ची मज्या घेणे(पुरू मारेल एका दिवशी मला) , ह्या सगळ्या गोष्टीं मध्ये वेळ कसा जातो काही समाजात नाहीये, बाहेर जाने पिक्चर बघणे , बोलिंग करणे हे तर आहेच. आता मला सांगा कशी हो येईल आठवण घराची. आता पुढील वोळी जर लिहिल्या तर काही अतिशोक्ती कशी होणार बारा .
इथे मी आलो , माझिया देश्याहून |
गावाच्या दूर , घराला सोडून |
पार इथ मला भेटला , साथ मित्रांचा
न आठवे घर , काय हवे अधिक ह्या हून |
आता रोज आमचे गप्पा वाढत रंगत आहेत, प्रत्येकाचे खाजगी किस्स्यान पासून तर प्रथाविराज चव्हाण, मुघल सल्तनत , छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचा इतिहास सगळ्या गोष्टींवर चर्च्या रंगत आहे ( मी हे विषयां वर बोलतो आणि बोर करतो म्हणून मित्र माझ्या वर मानसिक छळ करतो ह्याचा दावा टाकणार आसं वाटते) मध्ये मध्ये राजकारणाचा विषय असतोच ( ते कसे सुटणार पाटालान कडून ) .
मला भारतातून मित्र म्हणतात पाटील अमेरिकेत पोहोचले नि पोहोचले अमेरिकेत खूप लवकर रंगले पण. पण ह्या लवकर रमण्या मध्ये एक कारण आहे , ते म्हणजे मैत्रीचा , मैत्री मध्ये दाखवलेल्या माणुसकीचा. हो माणुसकी,मी इथ येण्या आधी खूप ऐकलय कि , अमेरिकेत जाणार्या लोक माणुसकी नावाची गोष्ट विसरतात , तिथ जाऊन लोक खूप profetional होतात , कुणी कुणाचा विचार करत नसतो. पण तसा नाहीये, माणुसकी सगळीकडेच आहे पण ते तुमच्यावर आवलंबून आहे , तुमच्या वागण्यावर आवलंबून आहे , तुमच्या संस्कारावर आवलंबून आहे. आता मला हे माहिती नाही कि मी इथ आलो आणि सगळ्यांनी मदत केली , मी खूप इथ सगळ्यांत मिसळलो , सगळे मला आगदी मित्र झाले . हे सगळे माझ्या स्वभाव मुळे आहे का सगळ्यांच्या स्वभाव मुळे का आम्हा सगळ्यांतल्या भारतीय संस्कारा मूळे आहे. खरच भारतीय कुठे हि राहो त्यांचे काही चांगले संस्कार कधी विसरत नाहीत , आपसात कितीही भांडणे असोत पण मिळून मिसळून राहतात आणि एक मेकांना मदत करणे , एक मेकांना घेऊन चालणे, एक मेकांच्या सुख दुखात सहभागी होणे हे भारतीयांच्या संस्कारात बसलेलाच आहे. निदान मी हे म्हणू शकतो कि हे सगळा माझ्या संस्कारात आहे कारण मी भारतीय आहे. म्हणून म्हणतो मी कि कोण म्हणे अमेरिकेत गेल्यावर भारतीय लोक माणुसकी विसरतात , भारतीय लोक जग भ्रम्हन करतात , जगाची संस्कृतीशी जुळवून घेतात , कधी कधी जगाची संस्क्रती आत्मसात पण करतात पण माणुसकी जे आहे , भारतीयत्व ज्याला म्हणतात ते नाही विसरत . मी हे नाही म्हणत कि जिथं जिथं माणुसकी आहे तिथं तिथं भारतीय आहेच. हे पण नाही म्हणत कि माणुसकी फक्त भारतीयांतच आहे , कदाचित भारतियन पेक्ष्या इतर देश्यंत ल्या लोकांत माणुसकी ज्यास्त आहे पण मी हे नक्की म्हणेन कि जिथं जिथं भारतीय आहेत तिथ तिथ माणुसकी नावाची चीज नक्कीच आहे .

सुधाकर पाटील
तारीख २ डिसेंबर २००९