Sunday, October 14, 2012

नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणूक

नांदेड-वाघाळा महानगर पालिका निवडणूक

आज नांदेड वाघाळा महानगर पालिका साठी रणशिंग फुंकलेल्या सगळ्या योध्याचं ( योध्याचं म्हणायचं का आणखी काय म्हणायचं ह्या साठी खूप विचार केला पण शब्द दुसरा भेटला नाही किंवा मी लिहू शकलो नाही म्हणून तुम्ही योद्धे चं समजा ) ... तर रणशिंग फुंकलेल्या योध्याचं नशीब ... नशीब ठरवणाऱ्या मशीन मध्ये बंद झालं . ७-८ दिवसां पासून चालत आसलेल्या रणधुमाळीत कळलं कि धुरा सारखा पैसा उधळल्या गेला, उधळाय लाच पाहिजे. नांदेड च्या धुळी पासून बनवलेला पैसा धुरा सारखा निवडणुकीत उधळायलाच पाहिजे... आसो. तर नांदेड महानगर पालिकेची ची हि निवडणूक जरी बाकी निवडणूक सारखी दर पाच वर्षांनी येणारी वाटत असली तरी खूप महत्वाची आहे. ..... रोज एक कॉंग्रेस चा घोटाळा बाहेर येत आसला ..... लोक दर मिनिटाला जरी कॉंग्रेस ला हटवा म्हणत असले ... जरी लोकांना देशात आता कॉंग्रेस ला पर्याय शोधावासा वाटत आसला .... एकंदरीत सध्या देशा मध्ये कॉंग्रेस ची परिस्तिथी हलाकीची झालेली असली तरी आम्हा नांदेड(शहर) करांना एवढं कळून चुकलंय कि नांदेड मध्ये कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. नांदेड चा प्रत्येक युवक जरी रोज फेसबुक वर कॉंग्रेस ला शिव्या घालत आसला तरी आज तो जावून हाताच्या पंज्यालाच शिक्का मारला असेल .... खरच ह्या गोष्टीचा नांदेड करांचा 'आदर्श' बाकी भारतीय लोकांना घेयायलाच पाहिजे ..... आता तुम्ही उगीच विर्यारू नका ....कि का नांदेड करांच्या मनात एवढं कॉंग्रेसस चा 'आदर्श' ???? ..... कारण एकच ....'माननीय माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण . होय आम्ही नांदेड करांना जरी माहित आसले कि अशोक रावांना 'आदर्श' मुळे मुख्य मंत्री पदावरून पायउतार करावे लागले तरी आम्ही त्यांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन (मुंबई च्या आदर्श वर काना डोळा करून) त्यांनी वेचलेल्या उमेदवारालाच च मतदान करू आणि पुन्हा दाखवून देऊ कि होय नांदेड मध्ये अशोक राव साहेबांचे वर्चस्व आहे, आणि कॉंग्रेस च्या हाय कमांड ला सांगू कि बाई साहेब आज मराठवाड्या साठी न्हावे तर महाराष्ट्र साठी कॉंग्रेस पुढे एकच पर्याय आहे .....तो म्हणजे माननीय अशोकराव जी चव्हाण.
आणि हेही खरच आहे नांदेड चे भलेही अर्धे रस्ते उखडलेले आसले , ३ वर्ष पासून नांदेड कर जागो जागी उखडून ठेवलेल्या रस्त्यांची नुसती धूळ खात आसले, जरी त्याच धुळीतून नेत्यांच्या नवनवीन गाड्या लोकांवर धूळ उधळत सुसाट धावत असल्या जात असल्या लोकांच्या तरी थोडा बहोत का होईना नांदेड चा विकास झाला खरा . मला तरी वाटते खरच नांदेड चा विकास झाला .... पण ह्याहून हे ज्यास्त वाटते कि जर नांदेड चा म्हणजे नांदेड शहराचा ह्या पुढे विकास बघायचा असेल तर खरच अशोकराव जिंदाबाद म्हनाव्हाच लागेल मग भले हि कुणी कोणत्याही पक्षाचा समर्थक आसू देत.
.... मला हे पण वाटते कि जसा विचार मी करत आहे तसाच विचार नांदेड करांनी आज केला असेल, आणि काही अपवाद वगळता म्हणजे काही उमेदवारांचा व्यक्तिगत प्रभाव सोडला तर बाकी बहुतांश उमेदवारान साठी ज्या पंज्यावर लोकांनी आज शिक्का मारला तो पंज्या कुणाचा आहे ते न पाहता अशोकराव चा पंज्या समजून पंज्या वर शिक्का मारला आसावा. आणि म्हणूनच उद्या पुन्हा एकदा कॉंग्रेस चा झेंडा नांदेड वाघाळा महानगर पालिकेवर फडकेल हे निच्चीत .
सुधाकर पाटील
१४ ऑक्टोंबर २०१२

आज नांदेड वाघाळा महानगर पालिका साठी रणशिंग फुंकलेल्या सगळ्या योध्याचं ( योध्याचं म्हणायचं का आणखी काय म्हणायचं ह्या साठी खूप विचार केला पण शब्द दुसरा भेटला नाही किंवा मी लिहू शकलो नाही म्हणून तुम्ही योद्धे चं समजा ) ... तर रणशिंग फुंकलेल्या योध्याचं नशीब ... नशीब ठरवणाऱ्या मशीन मध्ये बंद झालं . ७-८ दिवसां पासून चालत आसलेल्या रणधुमाळीत कळलं कि धुरा सारखा पैसा उधळल्या गेला, उधळाय लाच पाहिजे. नांदेड च्या धुळी पासून बनवलेला पैसा धुरा सारखा निवडणुकीत उधळायलाच पाहिजे... आसो. तर नांदेड महानगर पालिकेची ची हि निवडणूक जरी बाकी निवडणूक सारखी दर पाच वर्षांनी येणारी वाटत असली तरी खूप महत्वाची आहे. ..... रोज एक कॉंग्रेस चा घोटाळा बाहेर येत आसला ..... लोक दर मिनिटाला जरी कॉंग्रेस ला हटवा म्हणत असले ... जरी लोकांना देशात आता कॉंग्रेस ला पर्याय शोधावासा वाटत आसला .... एकंदरीत सध्या देशा मध्ये कॉंग्रेस ची परिस्तिथी हलाकीची झालेली असली तरी आम्हा नांदेड(शहर) करांना एवढं कळून चुकलंय कि नांदेड मध्ये कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही. नांदेड चा प्रत्येक युवक जरी रोज फेसबुक वर कॉंग्रेस ला शिव्या घालत आसला तरी आज तो जावून हाताच्या पंज्यालाच शिक्का मारला असेल .... खरच ह्या गोष्टीचा नांदेड करांचा 'आदर्श' बाकी भारतीय लोकांना घेयायलाच पाहिजे ..... आता तुम्ही उगीच विर्यारू नका ....कि का नांदेड करांच्या मनात एवढं कॉंग्रेसस चा 'आदर्श' ???? ..... कारण एकच ....'माननीय माजी मुख्य मंत्री अशोकराव चव्हाण . होय आम्ही नांदेड करांना जरी माहित आसले कि अशोक रावांना 'आदर्श' मुळे मुख्य मंत्री पदावरून पायउतार करावे लागले तरी आम्ही त्यांचे आदर्श डोळ्या समोर ठेऊन (मुंबई च्या आदर्श वर काना डोळा करून) त्यांनी वेचलेल्या उमेदवारालाच च मतदान करू आणि पुन्हा दाखवून देऊ कि होय नांदेड मध्ये अशोक राव साहेबांचे वर्चस्व आहे, आणि कॉंग्रेस च्या हाय कमांड ला सांगू कि बाई साहेब आज मराठवाड्या साठी न्हावे तर महाराष्ट्र साठी कॉंग्रेस पुढे एकच पर्याय आहे .....तो म्हणजे माननीय अशोकराव जी चव्हाण.
आणि हेही खरच आहे नांदेड चे भलेही अर्धे रस्ते उखडलेले आसले , ३ वर्ष पासून नांदेड कर जागो जागी उखडून ठेवलेल्या रस्त्यांची नुसती धूळ खात आसले, जरी त्याच धुळीतून नेत्यांच्या नवनवीन गाड्या लोकांवर धूळ उधळत सुसाट धावत असल्या जात असल्या लोकांच्या तरी थोडा बहोत का होईना नांदेड चा विकास झाला खरा . मला तरी वाटते खरच नांदेड चा विकास झाला .... पण ह्याहून हे ज्यास्त वाटते कि जर नांदेड चा म्हणजे नांदेड शहराचा ह्या पुढे विकास बघायचा असेल तर खरच अशोकराव जिंदाबाद म्हनाव्हाच लागेल मग भले हि कुणी कोणत्याही पक्षाचा समर्थक आसू देत.
.... मला हे पण वाटते कि जसा विचार मी करत आहे तसाच विचार नांदेड करांनी आज केला असेल, आणि काही अपवाद वगळता म्हणजे काही उमेदवारांचा व्यक्तिगत प्रभाव सोडला तर बाकी बहुतांश उमेदवारान साठी ज्या पंज्यावर लोकांनी आज शिक्का मारला तो पंज्या कुणाचा आहे ते न पाहता अशोकराव चा पंज्या समजून पंज्या वर शिक्का मारला आसावा. आणि म्हणूनच उद्या पुन्हा एकदा कॉंग्रेस चा झेंडा नांदेड वाघाळा महानगर पालिकेवर फडकेल हे निच्चीत .

सुधाकर पाटील
१४ ऑक्टोंबर २०१२

Wednesday, September 5, 2012

नोकरी बढती मध्ये आरक्षण

होय आरक्षण ला आमचा विरोध नाही
------------------
होय आरक्षण देण्याचा उदेश चांगलाच होता, त्या वेळेस एखाद्या समाजाची परिस्तिथी खूप बिकट होती , त्या समाजाबद्दलचे विचार हे खूप खालावलेले होते आणि त्या मुळेच ह्या परिस्तिथी ला तोंड देणारे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात ह्याची नोंद घेतली, वंचित समाजासाठी आरक्षण असायला पाहिजे ज्या मुळे वंचित समाज वर येईल आणि एक भक्कम भारत निर्माण होईल हाच त्यांचा उदेश होता . मला एवढंच म्हणायचं आहे त्यांचा उदेश चांगलाच होता पण आता हे जे काही चाललय ह्या राजकीय नेत्यांचा उदेश हा एक वेगळाच आहे . लोकांनी हे समजून घेयायला पाहिजे दोन्ही विचारांची तुलना होऊच शकत नाही. समाजातील विसंगत पना दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानात नोंद घेतली होती आणि आता हे जे काही चाललंय ह्या मुळे समाजातला विसंगत पना दूर होणे तर दूरच पण ह्या उलट विसंगत पना वाढण्याला खत पाणी घालण्याचं काम चाललंय.

आता नोकरी मध्ये बढती देण्या च्या विधेयक बदल बोलायचा झालं तर ..... ह्यात फक्त राजकीय हेतू आहे असच मला वाटते ..... हे तर आसं झालं कि मुलाला महाविद्यालयात प्रवेश घेताना आरक्षण दिला आणि पुढ प्रत्येक परीक्षे मध्ये आरक्षण , पहिल्या वर्ष्यातून दुसर्या वर्षी प्रवेश करताना पण आरक्षण , आणि दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या... ( आता तेच उरलाय ... खरच तिथ पण आरक्षण आणतील हे लोक .... आहो खुल्या वर्गाला पूर्ण विषय पास होणे गरजेचे तर, आरक्षण मुळे ४ विषय मध्ये नापास जरी झाले तरी पुढच्या वर्ष्यात प्रवेश आणि त्यांना ते ४ विषय मध्ये पास होण्याची गरज सुधा नाही ...... आसं पण करतील हे लोक ) ..... खरच एक वेळेस नोकरी लागली तर पुढ त्यांना कश्याला पाहिजे हो आरक्षण ? ... स्वतः च्या कार्यक्षमते च्या आधारावरच बढती होणे गरजेचे नाही का ?. आणि ह्या वर्गातील जे लोक नोकरी करत आहेत खरच त्यांना स्वतः ला पण वाटत असेल कि नकोय त्यांना आरक्षण ... पण ह्या राजकीय नेत्यांना पाहिजे ना . मला मान्य आहे पिच्याड्लेल्या समाजाला समाजातल्या व्यक्तींना समोर येण्या साठी आरक्षण गरज आहे पण मग काय बढती साठी पण ....

एक म्हण आहे ' एखाद्याला पाण्या जवळ नेऊ शकतो पण त्याला पाणी स्वतःच प्यावे लागेल' ...... इथं आरक्षण च्या बाबतीत उलट होत आहे .. एखाद्या ला पाण्या जवळ तर नेतच आहेत (ते पण ५ लोकांच्या खांद्यावर उचलून ) आणि पाण्या जवळ नेऊन पण तो पाणी पीत नसेल तर त्याच्या तोंडात पाणी टाकल्या जात आहे .... पुढ चालून मग काही दिवसांनी आसं होईल कि तो पाणी gitaknar नाही मग हे लोक त्याच्या नरड्यात नळी टाकून पाणी पाजावायचा प्रत्न करतील . एका वाक्यात बोलायचा असेल तर आरक्षण च्या बाबतीत राजकारण करू नये , डॉक्टर बाबासाहेबांचे निस्वार्थ आणि दूरदृष्टी उदेश समजून घ्यावे , बघावे कि खरच कोणत्या लोकांना आरक्षण ची गरज आहे , आणि आरक्षण देऊन लोकांना पाण्याजवळ नेण्यात यावे , पाण्याजवळ जाण्याची क्षमता द्यावी , त्याला पाणी पिण्यास सक्षम करावे पण पाणी पाजे पर्यंत आरक्षण नको .........

आजून एक खूप मोठा विषय हा पण आहे कि आरक्षण चा लाभ खरच गरजूंना होत आहे का ??? , कि आरक्षण च्या मुद्याचा लाभ हे राजकीय लोकांना ????? . गरजून पर्यंत आरक्षण चा लाभ जात आहे का ?? कि राजकीय लोक, राजकीय पार्टी पर्यंत आरक्षण च्या मुद्याचा लाभ ??? ….

मित्रहो म्हणूनच म्हणतो माझा विरोध आरक्षण ला मुळीच नाहीये , आरक्षण च्या मूळ उदेष्याला तर नाहीच नाही ..... पण ह्या आरक्षण वरनं जे काही राजकारण चाललय त्याचा वीट आलाय.

सुधाकर पाटील
६ सप्टेंबर २०१२

Sunday, June 17, 2012



दोन पुढाऱ्यांचा संभाषण
---------------------------
काहीच दिवस झाले माझ्या तिकीटा बदल ची कहाणी मी सांगितलीच तुम्हाला..... त्याच तिकीटा बदल विचार करत होतो आणि
मग कॉल आला ... एका फोन चा cross connection झाला.... आणि दोन राजकारणी पुढाऱ्यांचा संवाद कानावर पडला ........एक बोलत होता दुसर्याला

... आपणच दोघे तिकीट घेऊ, आरे ऐक ना आपणच दोघे तिकीट घेऊ
उगीच तिसर्याला chance द्यायचा कश्याला
मी अर्धे मतं खातो , तू अर्धे मतं खा
खाण्याचं काम आपणच करू , तिसर्याचं पोट भरवायचं कश्याला.

आपणच दोघे, एकमेका विरोधात प्रचार करू
तिसर्याला प्रचारात मिरवू द्यायचं कश्याला
मी तुला बोलतो , तू मला बोल
चिखलात खेळायची सवयच आपल्याला , तिसऱ्या ला चिखलात भरवायचं कश्याला

वेळ प्रसंगी, आपणच प्रचारात एकमेकांना मारून पण घेऊ
उगाच लोकांना शंका कश्याला ..
मी करतो मारल्या सारखं, तू कर लागल्या सारखं
मधून येवढं तूझं माझं जमत आसताना , वरनं मित्रत्व दाखवायचा कश्याला..

निवडणूक झाल्यावर , दोघे मिळून काम करू ,
एक मेकांच्या धंद्या ची वाट लावायची कश्याला
तू निवडून आला तर , मी म्हटलं तिथ तू सही कर
मी निवडून आलो तर , तू म्हटलं तिथ मी सही करतो
दोघांचे गोदाम भरत असतांना , उगाच खिश्याला कडकी कश्याला ...

आपल्या ताटातून उरलेलं खाणारे , कुत्रे पण तेच ठेऊ
उगच तिसऱ्या कुत्राला, मटणाचा वास देयायचा कश्याला
तू सत्तेत आला तर २ कुत्रे तुझ्या साठी भुंकतील
मी सत्तेत आलो तर तेच कुत्रे माझ्या साठी भुंकतील
सगळी कडे आपलीच मक्तेदारी असताना , तिसऱ्या गुत्तेदाराला तयार करायचच कश्याला ...

म्हणूनच म्हणतो , दोघे मिळून तिकीट घेऊ
उगीच तिसऱ्याला, chance द्यायचं कश्याला
मी हाताला घड्याळ बांधतो, तू हात वर कर
हातावरच घड्याळ बांधलेली असतांना , इन्जीन म्हधला धूर किंवा धनुष्याची बाण सुटू द्यायची कश्याला
सुधाकर पाटील
जून १६ २०१२

Friday, June 8, 2012

आशी घडली माझ्या तिकीटाची कहाणी

आशी घडली माझ्या तिकीटाची कहाणी
२०१४ साठी तिकीट वाटप विचार मंथन सुरु होते... आणि मला आला फोन
मलाच आश्चर्य वाटले... अरे मला तिकीट देतय तरी कोण ?

मुंडे म्हणाले भावू या आजच तिकीट घेवून जा
... पांढर्या शुभ्र कमळाला, तुमचा भक्कम आधार द्या
नांदेड जिल्ह्या मध्ये भाजप चा तुम्हीच व्हा वाली
तुमच्या सारख्या तरुण तडपदार नेत्यांची काढा एक र्याली

पुन्हा फोन वाजला तेव्हा आमच्या सौ ने फोन उचलला
नांदेड वरून अशोकरावांच्या सौ. चा फोन ? … आमच्या सौ चा भाव वधारला
गावभर ती सांगत फिरली, याचं हवाय कॉंग्रेसला हात
चीखालीकरणे दाखवले दात यांचीच आता अशोकराव साहेबांना साथ
दुपार होत नाही आणि शंकर आणा स्वतः फोनवर बोलले
माझा होकार नकार मिळण्यापूर्वी.. कोंबडी वडे धाडले

वामकुशी घेता घेता K K साहेबांचा आला फोन
होते न्हवते सगळे अधिकार सोडले.....सोडा आता मौन
पाहून माझे मौन, फोनवर गोरठेकर साहेब बोलले
गेला आमचा हातातला मतदारसंघ, आत्ता नाटक पुरे म्हटले
म्हटले, “उठा सुधाकरराव तुमची पाहिजे आम्हाला साथ
गेलेला गढ आमुचा.. पहायचय आम्हाला आता तुमच्या हातात “
भास्कररावांसारखे हु हु करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले
नांदेड चे खासदार म्हनून घेण्या पलीकडे ह्यांनी काय केले
डोळा जरा लागत नाही , आमचे वसंतराव च बोलले
तिकीटाचं काय एक कॉलेज च देतो .. शांत आवाजात कोकालले

आता मला कळून आले मला आलाय डिमांड
मला वाटलं एकेकाचं आता घेतला पाहिजे कमांड
नावातल्या साधर्म्याने फोनवर फोन आले
सावंत सरने तर देगलूरचे तिकीट दिल्याचे, लगेचच सांगितले
संध्याकाळी पाय मोकळे करू असे मनासी म्हटले
रस्त्यावर उतरतो तर आन्तापुरकर वाटेतच भेटले
मी राम राम करणार तो हातच त्यांनी धरले
म्हटले काल पर्यंतचा मुंबई मधला व्यापारी मी
आताच कुठे देगलूर ला घाठले ,
सांगून त्यांची कहाणी
देगलूर ला चुकून न येण्याचा वाचनच, माझ्या काढणं घेतले

आता काय करावे खरच मला कळत नाही
हि म्हणते लढून पहा एकदाची लढाई
शिंप्याने एक सदरा शिवला त्याचे रंग दहा
एक सत्तेचा लालची त्याच्या सतरा तर्हा
त्यातलाच एक रंग, होता आवडायला लागला
तेवढ्यात माझा डोळा धाडकन उघडला

कळलं मला राजकारणात कायबी खरं नाही
मानसं कधी बदलतात याची नसते ग्वाही
डोळस असून मला काही कळत नाही
मत देताच पुसली जाते हाताची शाई
वाटतं आपल्यालाच करावे लागेल आता तरी काही
सगळा धिंगाणा उघड्या डोळ्याने आता पाहवत नाही
- सुधाकर पाटील
३१ मे २०१२
(संधर्भ: मूळ कविता 'तिकीट ' कोचरेकर मंगेश)

Tuesday, May 1, 2012


नसतेस सोबत तू जेन्वा

नसतेस सोबत तू जेन्वा
जीव तुटका तुटका होतो ,
सगळ्यात बसून असताना
...उगाच भटकून येतो

नसतेस सोबत तू जेन्वा
मन तुझ्याच आठवणी रंगवतो
आठवणीत तुझ्या रमताना
उणीवेची तुझ्या
जाणीव करुनी तो देतो

नसतेस सोबत तू जेन्वा
काळीज ठोके थांबवतो
तुझ्या प्रेम स्पर्शाची
जणू वाट तो पाहतो

नसतेस सोबत तू जेन्वा
गाल चिंब चिंब होतात
डोळे हे वेडे रोज ...
अश्रू नाही
तर पाणीच ते ओकतात

नसतेस सोबत तू जेन्वा
घर सुनं सुनं वाटतो
एकटा मला पाहून
मलाच गिळण्यास उठतो

नसतेस सोबत तू जेन्वा
वेळ माझ्या शी भांडतो
भेटाल कधी आपण
रोज मला तो विचारतो

------ सुधाकर पाटील 
         १ मे २०१२
हातोडा - नांदेड जिल्हा

सध्या नांदेड जिल्ह्या मध्ये अतिक्रमण हटाव 'हातोडा' मोहीम खूप चर्चेत आहे . आस समजलं कि बाकी सगळ्या मोहिमेच्या "successful implementation " नंतर हि पण मोहीम success झाली आहे . लोकांनी पण तेवढाच प्रतिसाद देत आहेत , मोहिमेचा मुख्य भाग म्हणजे ह्या मोहिमेला लोकांनी मोठा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दाखवत आहेत आणि स्वत आपले अतिक्रमण हटवत आहेत. जिल्हाधिकारी नि हाती घेतलेले कॉपीमुक्त जिल...्हा , पडतापासनी आणि आता हि हातोडा मोहीम सगळ्याच मोहीम खूप व्यवस्तीत रित्या हाताळल्या गेल्या. खरच मागील ३ वर्ष्यात पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी ची कामगिरी तारीफ करण्याजोगी आहे . पण हे सगळे सगळ्याच लोकांना आवडेल आसे नाही, जिल्हाधिकारी च्या ह्या मोहिमे मुळे काही लोकांच्या पोटात कळ येत आहे आस समजलं. ते तर होणारच एखादा प्रशासकीय अधिकारी चांगला, निस्वार्थी आला सगळ्यात आधी पोट दुखतं ते राजकीय नेत्यांचं. आता फुकट आणि अनेक अव्यध मार्गाने अवाढव्य वाढलेल्या पोटावर लाथ बसत असेल तर पोट हे दुखणारच. काय तर म्हणे हे अश्या मोहिमे मुळे नांदेड जिल्ह्याचा विकास होत नाहीये , आरे मग कश्याने होतो विकास. तुमच्या फक्त कागदोपत्री शाळा, कागदोपत्री शिक्षक आसलेल्या आणि कागदोपत्री शाळेतून निघेले मुलं... हे आहे का विकास? कि कुठे पण अव्याध्य रित्या इमारती उभे करून रहदारीची कोंडी करणे हे आहे विकास ? ... हो असणारच कारण विकास पण तुम्ही कागदोपत्री दाखवता न ... मग तुम्हाला कॉपी मुक्त आणि पडतापासनी ची झळ हे लागणारच. वरून आता हे 'हातोडा' ... जे लोक (लोक म्हणजे राजकीय लोक बरं का ) ह्या मोहिमेला विरोध करत आहेत आणि शिष्टमंडळ घेऊन मुख्य मंत्री महोदय ला भेटणार आहेत नं, त्या लोकांच्या नक्कीच अव्यध जागेवर , अव्यध बांधलेल्या बगला, दुकानाचा गाळा आणि even शाळा कॉलेगे च्या इमारतीवर हातोडा पडत किंवा पडणार असेल .... म्हणूनच हि नाकदुखी चाललीये. आरे हो बरोबरच आहे , आता हे सगळा पडला तर मग विकास कसा होणार, सगळेच धंदे बंध झाले तर मग पैसा कसा येणार .... मग २ वर्ष्यावर आलेल्या election ची ताराजोड कशी होणार ....बाबानो तुम्ही तर कधी काही अभिमानाने सांगण्या जोगं काम नाही करत ( प्रत्येकाच्या लग्न , कार्यक्रम मध्ये जाऊन शाल घेण्याच्या व्यतिरिक्त - ते काम मात्र तुम्ही किंवा तुमचे पोरं बाळं अगदी उत्तम प्रकारे पार पडता बरं का ... खरच मानावे लागेल ). आता काही प्रशासकीय अधिकारी करतायत चांगलं काम तर करू द्या नं उगाच का नुसत्या उठाठेव करताय ????????.

सुधाकर पाटील
एप्रिल ४ २०१२

Sunday, April 1, 2012

विमान सुटले...

विमान सुटले ,
विमान सुटले , सुरक्षा तपास झाले .... क्षणात डोळे टचकन ओले २
विमान सुटले , पडले चेहरे , क्षण साधाया हसरे झाले ...

विमान सुटले ... हाता मधुनी हात कापरा तरी सुटेना २
... ... अंतरातली ओली माया तुटुडे म्हटले तरी तुटेना ....

कारे इतका लळा लाउनी नंतर मग हे विमान सुटते २
डोळ्यां देखत उडत जाते , आठवणींचा ठिपका होते

विमान उडले , विमानतळा वरच्या सयामच कचरा झाला .२
विमान उडले , डोळ्या मधल्या अश्रूंचा पारा फुटला
विमान उडले , डोळ्या मधल्या अश्रूंचा पारा फुटला ...

....सुधाकर .. संदर्भ ... संदीप खरे आणि सलील कुलकर्णी

Friday, March 2, 2012

नांदेड जिल्हा आणि रेल्वे - १

नांदेड जिल्हा आणि रेल्वे - १ : मुंबई मध्ये २ मार्च ला मुखमंत्री महोदय नि रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी ह्यांना निमंत्रण दिलं आणि राज्यातल्या खासदारांना पण बोलावलं असं समजलं. मग वाटलं कि आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार मिटिंग ला काय नाही जाणार आणि आपल्या मागण्या कुणी नाही मांडणार . पण असं नाही झाला हो एरवी लोकसभा आणि विधानसभे मध्ये शक्यतो गैरहजर राहणारे आणि चुकून हजर राहिलेच तर सभे मध्ये चक्क झोपा काढणारे आमचे खासदार आमदार ह्या वेळेस जरासं का होईना स्वतः ची लाज राखली असं समजलं, रेल्वे मंत्री महोदय समोर आमचे खासदार महोदय आपले मौन उघडले आणि नांदेड जिल्ह्याचे रेल्वे संभधीत काही मागण्या मांडल्या. आता ते मान्य होतील व नाही होतील ते पुढची गोष्ट.
खरच काही गोष्टी नांदेड साठी अत्यंत गरजेचे आहेत. नांदेड पुणे रोज कदाचित कमीत कमी 3००० आणि वेकेंड ला तर ५००० लोकांचं येणं जानं आहे तरी एकही रेल्वे नियमित तत्वावर नाही त्यामुळे हितं travels वाल्यांचा राज्य चाललंय. आहो मला तर वाटते हे नांदेड पुणे रेल्वे चालू करू नका म्हणून travels वाल्यांचे कुठं हफ्ते जात असावेत ह्या शिष्टमंडळ ला. पण आता ती मागणी मांडली आणि ती मागणी मान्य होण्याचे संकेत आहेत त्याच बरोबर नांदेड - बिदर चे पण काम चलू कार्नायची मागणी तसेच मुदखेड परभणी दुहेरी मार्ग ह्या तीन तरी मागण्या मान्य होण्याची संकेत आहेत. नांदेड - लातूर नवीन मार्गाचे सर्वेक्षण चं पण काम होण्याचे २५ टक्के संकेत आहेत. नांदेड जिल्ह्य चे माझे खासदार आमदार महोदायानो नांदेड जिल्ह्याचे प्रत्येक अश्या गोष्टींसाठी असेच सरकार कडे सतत पाठपुरवठा करा आणि कामं करून घ्या हि विनंती -- सुधाकर पाटील आणि समस्त नांदेड जिल्ह्याचे नागरिक
३ मार्च २०१२

Sunday, February 26, 2012

सगळेच एका माळेचे बेशरमाचे फुलं ..

सगळेच एका माळेचे बेशरमाचे फुलं .............. आताच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालीखे ची निवडणूक झाली, निवडणुकीच्या आधी प्रत्येक राजकीय पक्ष्याचे नेते मंडळी एकमेकांवर शेन फेकत होते , आरोप प्रत्यारोप करत होते. काही लोकांनी तर व्यायाक्तिक पातळीवर जाऊन शाब्दिक चिखल, शेन किंवा आणखीन काही फेकलेलं आपणच पाहिलोत ऐकलोत. पण आता निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापनेची वेळ आली तर नुसती रस्सीखेच चालू आ...हे. ज्या ज्या जागी एका पक्ष्याची एकहाती सत्ता नाही आली तिथे आधी कठोर विरोध करणाऱ्यान सोबतच युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी धावपळ चालू झाली आहे .
मला समजत नाही आम्ही सामान्य जनता ह्या सगळ्या लबाड , थोताड लोकांवर कसकाय विश्वास ठेवत आलोय आणि आजूनही ठेवतोय, आजूनही ह्यांच्या निवडणुकीच्या काळात बोललेल्या वाक्यांवर बळी पडतोय. हे लोक निवडणुकीच्या काळात येतात एकमेकांवर आरोप करतात एकून एकाचा शब्तिक बलात्कार करतात आणि पडद्या मागे मात्र एकच आसतात. म्हणजे ते एकंदरीत सगळ्या सामान्य जनतेला 'उल्लू' बनवतात आणि मुख्य म्हणजे आम्ही 'उल्लू' बनत आलो आन बनतोय.
मित्रहो मला एकच सांगायचा आहे हे सगळे नेते एकच , ह्यांना ना तुमच्या आमच्या भावनांचं काही घेणं देणं आहे कि देश्याच्या, राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या हिताचं घेणं देणं आहे... ह्यांना फक्त हवी आहे ती सत्ता मग ती कश्या प्रकारे हि मिळाली तरी चालेल. मग त्या नेत्यांच्या बोलण्या प्रमाणे तुम्ही आम्ही का वागावे ????, त्यांनी म्हटले तर नाचावे ??? आणि त्यांनी म्हटले तर पाय तोडून बसावे ??.... का का करावे असे ???.... खरच असे वाटते कि मतदान करावे तर करावे कुणाला ???... जर निवडणुकी नंतर पडलेला आणि निवडून आलेला दोघे पण एकच तर निवडून द्यावे तर कुणाला ?????????????? ...सगळे एकाच माळेचे बेशरमाचे फुलंच आसतील तर माळ वोवायची ती कशाला ....... ह्या प्रश्नांचे उत्तर मला तरी सापडत नाहीये ........... बघा तुम्हाला सपातील का ते ..............
सुधाकर पाटील
25 Feb 2012

एका लग्नाची दुसरी गोष्ट

एका लग्नाची दुसरी गोष्ट :मागच्या ३ आठवडा पासून मी एका मराठी मालिकेला follow करतोय. होय सध्या झी-मराठी वर एक मालिका येत आहे "एका लग्नाची दुसरी गोष्ट" , खूपच मस्त मालिका आहे. , एक एक पात्राची एक वेगळीच वोळख आहे, त्याचा रंग वेगळा आहे , स्वभाव वेगळा आहे मुख्य म्हणजे प्रत्येक कलाकाराने चोख कामगिरी केलेली आहे. नवीन पिढी आणि नवीन पिढी मधल्या विचारांची आणि जुन्या लोकांच्या इच्या आकांग्श्या ची नुसती गल्लत... कशी घातल्या जाते ते ह्या मालिके मध्ये दाखवलेला आहे . नवीन पिढीच्या मुलांना जुने लोक त्यांच्या प्रमाणे कसं वागवून घेतात, एकत्र कुटुंब लोक कशे आसतात, कसे वागतात हे सगळे ह्या मालिकेत पाहायला मिळेल. खरच एकत्र कुटुंब मध्ये हे असे पात्र रोज पाहायला अनुभवायला मिळतात. त्यांच्या सोबत वागताना , त्यांच्या सोबत वावरताना खूप माज्या येते. एकंदरीत एकत्र कुटुंब म्हणजे अशीच धमाल, कुठची हि धमाल करण्यासाठी कुणा बाहेर्च्याची आवशाकताच भासत नाही कारण कवयत्री कुहू घरातच असते, तर संथ ज्ञानेश्वर घरातच असतात , प्रत्येक गोष्टीवर भाषण देणारे राजकारणी व्यक्ती घरातच असते तर घरात काय चाललंय ह्याच्या कडे लक्ष नं देता आपल्याच धुन्धीत राहणारे पण घरातच आसतात. सगळ्यांना आपल्या प्रमाणे , जुन्या रूढी प्रमाणे वागणारी आणि सगळ्यांना वागवणारी 'आजी' पण घरात असते आणि एकदम नवीन विचाराने चालणारी rational निर्णय घेणारी एखादी व्यक्ती पण घरातच आसते. कुणाचाच विचार नं करता स्वतः चाच स्वार्थ साधणारी व्यक्ती घरातच असते तर दुसर्यांचा विचार करताना स्वतः ला विसरणारी, स्वतः काय हवंय हेच विसरून जाणारी 'आई' पण घरातच असते.
आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न ह्या मालिके मधून केलेला आहे.मला अतिशय आवडत आहे हि मालिका ...... तुम्हास आवडली का ? ...... नाही पाहिलात तर पहा तुम्हाला पण आवडेल का ते .................
सुधाकर पाटील

Wednesday, February 1, 2012

धर्माबाद तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी काढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणणारे "गल्लीत" ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे काढता पाय करावा लागला तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल.
धर्माबाद तालुक्याचं बोलायचं झालं तर , परवाच्या नगर पालिकांच्या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धर्माबाद आणि उमरी तालुक्यांत एक तर्फी विजय मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना अभ्यास करायला पाहिजे ह्या विजयाचं नेमकं कारण काय होतं. माझ्या मता प्रमाणे ह्या भरगोस , एकतर्फी विजयाचं कारण एकच.. पक्ष्यातली एकजूट. होय पहिल्यांदा मी पहिला कि धर्माबाद तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते आपसातले भांडण सोडून आपसातले खेकड्याची चाल सोडून पक्ष्यासाठी काम केले, त्यांना काही घेणं देणं उरलेलं नव्हतं, उमेदवार कोण आहे ..... त्यांनी फक्त मेहनत घेतली ते पक्ष्यासाठी प्रतेकानी आपला अहम सोडून , गर्व सोडून काम केले आणि एकतर्फी निकाल आणला.
पण परत पालत्या घागरीवर पुन्हा पाणीच , पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याची निवडणूक आली आणि सगळ्यांची आपसात लढाई सुरु झाली. प्रत्येक जन स्वतः चच तूनतूनं हे कसं खण खण वाजतंय हे दाखवायचा प्रयत्न सुरु केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना आणि "गल्लीतल्या " नेत्यांना एकच सांगू इच्छितो , बाबानो तुम्ही आपसातल्या भांडणं मुळे , खेकडी चाल मुळे तुमची धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती गमावली आता तेच चूक परत होईल आसं मला चित्र दिसतंय ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. माननीय शरद पवार साहेबांचं पण हेच म्हणणं आहे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत राष्टवादी कॉंग्रेस च्या याश्याचं रहस्य आहे ....पक्ष्यातली एकजूट आणि जिथं कुठ अपयश आहे ते फक्त एकमेका मधल्या द्वेष मुळे किंवा स्वार्थामुळे .... तर मित्रानो विचार करा पक्ष्याशी एकजूट राहा, पक्ष्यासाठी काम करा मग पहा विजय तुमच्या कडे कसे धावत येतो ते.
धर्माबाद तालुक्याच्या कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यान बदल बोलायचा झालं तर ... धर्माबाद तालुक्याचे कॉंग्रेस नेते सध्या साम्भ्रणात आहेत , त्यांना नेमकं समजत नाहीये कि ते कॉंग्रेस चे कार्यकर्ते आहेत का नाहीयेत कारण मुळात ते कॉंग्रेस चे कार्यकर्ते नव्हेतच त्यांना जबरदस्ती ओढल्या गेलं कॉंग्रेस मध्ये. आणि म्हणून प्रत्येक जागी कॉंग्रेस च्या तिकिटावर कार्यकर्ते नाराज आहेत. हि नाराजी त्यांनी शांत बसून व्यक्त करत नाहीयेत तर त्यांनी हि नाराजी बर्याच जागी एक अपक्ष उमेदवार उभा करून व्यक्त केले. आणि मला उडत उडत हि पण गोष्ट आली कानावर हि धर्माबाद तालुक्य मध्ये कॉंग्रेस चे कार्यकर्ते पक्ष शेष्टी ला न जुमानता अपक्ष उमेदवारास निवडून आणायचा प्रयत्न चालू केलाय. एकंदरीत कॉंग्रेस चा धर्माबाद वर प्रभाव कमीच... पण त्यांना बर्याच वेळेस यश येतं त्याचं कारण मी वर सांगितला (राष्ट्रवादी कार्यकर्त्यान मधली आपसातली लढाई) .... तर बघू ह्या वेळेस divide and rule मुळे कॉंग्रेस ला धर्माबाद तालुका मध्ये पुन्हा एकदा सात मिळेल का नगर पालिका सारखा ११ खेळाडूंची दंडी उडून दारूण पराभव होईल.
आमचा कोणत्याही पक्ष्याशी संबंध जरी नसला तरी आम्हाला खूप वाईट वाटतंय कि मतदानाचा अधिकार असून सुधा ७ तारखेला आम्ही मतदान नाही करू शकत ..... म्हणूनच एकूणच हि उठाठेव.
-- सुधाकर पाटील

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी काढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणणारे गल्लीत ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे काढता पाय करावा लागला तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल.
धर्माबाद तालुक्याचं बोलायचं झालं तर , परवाच्या नगर पालिकांच्या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धर्माबाद आणि उमरी तालुक्यांत एक तर्फी विजय मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना अभ्यास करायला पाहिजे ह्या विजयाचं नेमकं कारण काय होतं. माझ्या मता प्रमाणे ह्या भरगोस , एकतर्फी विजयाचं कारण एकच.. पक्ष्यातली एकजूट. होय पहिल्यांदा मी पहिला कि धर्माबाद तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते आपसातले भांडण सोडून आपसातले खेकड्याची चाल सोडून पक्ष्यासाठी काम केले, त्यांना काही घेणं देणं उरलेलं नव्हतं, उमेदवार कोण आहे आणि आपला त्या उमेदवार सोबत जमत का नी ते ...... त्यांनी फक्त मेहनत घेतली ते पक्ष्यासाठी प्रतेकानी आपला अहम सोडून , गर्व सोडून काम केले आणि एकतर्फी निकाल आणला.
पण परत पालत्या घागरीवर पुन्हा पाणीच , पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याची निवडणूक आली आणि सगळ्यांची आपसात लढाई सुरु झाली. प्रत्येक जन स्वतः चच तूनतूनं हे कसं खण खण वाजतंय हे दाखवायचा प्रयत्न सुरु केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना आणि "गल्लीतल्या " नेत्यांना एकच सांगू इच्छितो , बाबानो तुम्ही आपसातल्या भांडणं मुळे , खेकडी चाल मुळे तुमची धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती गमावली आता तेच चूक परत होईल आसं मला चित्र दिसतंय ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. माननीय शरद पवार साहेबांचं पण हेच म्हणणं आहे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत राष्टवादी कॉंग्रेस च्या थोड्या बहोत याश्याचं रहस्य आहे पक्ष्यातली एकजूट आणि जिथं कुठ अपयश आहे ते फक्त एकमेका मधल्या द्वेष मुळे किंवा स्वार्थामुळे .... तर मित्रानो विचार करा पक्ष्याशी एकजूट राहा, पक्ष्यासाठी काम करा मग पहा विजय तुमच्या कडे कसे धावत येतो ते.
-- सुधाकर पाटील

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणी आपलच तूनतूनं खण खण वाजतंय म्हणून ओरडू ओरडू सांगत होता तर कुणी सहकारी आणि वरिष्ठ मंडळी जे म्हणेल ते करायला तयार म्हणून शांत बसून होता . कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी कढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणण...ारे गल्लीत ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे अपेक्ष्यान वर पाणी मरावं लागलं तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून वरिष्टांना न जुमानता अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि, कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल. बघू प्रचाराची रणधुमाळी कशी होईल, कोण कुणावर भारी पडेल , कोणाचे खिशे भरतील आणि कुणाचे खाली होतील
--- सुधाकर पाटील
Jan 30 2012

Thursday, January 19, 2012

काल्माडीची सुटका

हा हा हा , ९ महिने तुरुंगात राहिल्या नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे माजी अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी ची जमानत झाली आणि ते तुरुंगातून सुटले तेंव्हा आपला नेता सुटला म्हणून कॉंग्रेस भवन मध्ये म्हणे फटके वाजवण्यात आले, जल्लोष झाला. एकीकडे कॉंग्रेस च्या माननीय माणिकराव ठाकरेंचं , कलमाडी हे कॉंग्रेस कडून निलंबित झालले नेते आहेत त्यांचा पक्ष्याशी काहीएक संबंद नाहीये आस बोलणं आणि त्यांच्याच पक्ष्याच्या कार्याकारंनी चक्क कॉंग्रेस भवन मध्ये जल्लोष करणं पेढे वाटणं हे काही कॉंग्रेस चं विरोधाभासी वागणं वाटत नाहीये का?? . कलमाडी ची तिहार मधून सुटका झाल्यावर कॉंग्रेस भवन मध्ये जो जल्लोष झाला तो जल्लोष कॉंग्रेस च्या नेत्यांनी जवळून पाहायला हवा होता. मला हे कळत नाहीये ... कि एक नेता जो अत्यंत मोठा भष्ट्राचार करून जो जेल मध्ये गेला होता, ज्या व्यक्तीला पक्ष्यातून निलंबित केलं गेलं त्या व्यक्ती ची आता जेल मधून सुटका झाली म्हणून त्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद का व्हावा ??. ह्याच्या वरून आम्ही हे समजायचा का कि कॉंग्रेस ला पुण्या मध्ये दुसरा नेता नाहीये आणि कलमाडी शिवाय पर्याय नाहीये आणि तसं जर असेल तर त्याच पक्ष्याचे बडे नेते का म्हणतायत कि कॉंग्रेस चा आता कलमाडी शी काहीएक संबंद नाहीये ???? . कॉंग्रेस चा कलमाडी शी सबंध हे वरून लोकांना दाखवण्यासाठी नाहीये ?? का खरच काही संबध राहणार नाहीये ??. महानगर पालेकेच्या निवडणुकी मध्ये कॉंग्रेस चा प्रचार कलमाडी (खुलेआम) करणार नाहीयेत पण मधून कलमाडी शिवाय कॉंग्रेस ला गत्यंतर नाहीये एवढं समजण्या जोगे डोकं आहे आम्हा लोकांना.

ते जावूद्या पक्ष्याचं.... पण लोकांचा ह्या मध्ये काय विचार आहे. ९ महिन्या आधी जेन्वा कलमाडी भ्रष्टाच्यारात अटकले होते तेंव्हा पुण्या मध्ये निदर्शने झाले, capian झाले फासिबूक वर तर एकदम hot topic होता , त्या लोकांची प्रतिक्रिया आज काल्माडीची सुटका झाल्यावर कशी आणि काय असेल तेच महत्वाचं आहे. आणि त्याच बरोबर मतदार बंधूला जे काही झालं त्याची जान , आठवण आहे कि सगळं काही विसरून पालथ्या घागरीवर पाणी म्हणून मतदान करणार आहेत ते आता येत्या काही दिवसच कळेल.

मला एकच सांगायचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे कि पुण्याची जनता हुशार आहे , जाणती आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आहे तेंव्हा जनतेने महानगरपलीखे च्या निवडणुकीत विचार करून मतदान करावे. कलमाडी चा भ्रष्टाचार हे उघडकीस आलं म्हणून ते भ्रष्टाचारी झाले पण असे पण नेते आसतील जे भ्रष्टाचार केले , करत आसतील पण ते उघडकीस आले नसेल मग ते कॉंग्रेस चेच असतील आसं नाहीये ते कोणत्याही पक्ष्याचे आसतील. तेंव्हा मतदार बंधू तुमचा एक मत देतांना किमान २ मिनिट विच्य्रार करा आणि मगच मतदान करा .
मला वाटते मला हे सांगायची आवशकता नाहीये कारण मतदार बंधू जानकारी आहे त्याला सर्व काही माहिती असतं तेंवा ह्या मतदार बंधू ने आपला कल कुणाकडे देईल आणि पुण्याची जहागिरी बहाल कुणाला करेल ह्याची उत्सुकता आता आम्हाला आहे.
सुधाकर पाटील

Sunday, January 15, 2012

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला !

तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका

... सरकार म्हणतंय फेसबुक वर
आपले विचार मांडू नका
आहो सरकारला सांगा
उगीच आम्हाला गंडवू नका

सरकार ने केलेला अन्याय
सहन आता तुम्ही करू नका
अन्याय विरुद्ध लेखणी
तुमची कधी थांबवू नका

एक जुटीने विचार
आम्हाला आता करायचा आहे
गोड गोड बोलणाऱ्या नेत्यांना
चांगलाच धडा शिकवायचा आहे
आणि म्हणूनच.......
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका

सुधाकर पाटील
१५ जानेवारी २०१२

Monday, January 9, 2012

Veer Shivaji on Colors Chanel

मला कळला कि colors चानेल वाले खऱ्या इतिहास ला बाजूला ठेऊन निवळ मनोरंजन म्हणून वीर शिवाजी हि मालिकेचा प्रक्षेपण करत आहेत. मला हे सुरुवातीला जेन्वा colors वर मालिका सुरु झाली तेन्वाच वाटलं होतं कि हे colors वाले ह्या मालिकेला काहीही स्वरूप देतील, इतिहास बाजूला ठेऊन मनोरंजन मालिका चा स्वरूप देतील आणि मी जर हि मालिका बघितली तर मी खरा इतिहास विसरेन म्हणून आणि म्हणूनच हि मालिका मी फक्त एक दिवस पहिली आणि आणि पुढं न पाहण्याचा निर्धार केला. मित्रांनो आम्हाला राजेंचा इतिहास मनोरंजन म्हणून नाही पहायचा तर राजेंच्या इतिहासातून काही शिकण्या साठी, शिकलेल्या इतिहासातून स्वतःला घडवण्यासाठी राजेंचा इतिहास वाचायचा , पहायचा आणि ऐकायचा आहे .... मनोरंजन साठी आहेत च कि दुसरे भरपूर मालिका....
परत एकदा मी " स्टार प्रहाव वर आलेली "राजा शिवछत्रपती" पाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण करा ... http://www.apalimarathi.com/ वर ..... आणि जर तुम्हाला वाटला कि colors वीर शिवाजी मालिके मध्ये काहीकी दाखवत आहे तर कृपया काहीही करून colors वरची "वीर शिवाजी" पाहण्यचे टाळा .. सुधाकर पाटील