Sunday, April 1, 2012

विमान सुटले...

विमान सुटले ,
विमान सुटले , सुरक्षा तपास झाले .... क्षणात डोळे टचकन ओले २
विमान सुटले , पडले चेहरे , क्षण साधाया हसरे झाले ...

विमान सुटले ... हाता मधुनी हात कापरा तरी सुटेना २
... ... अंतरातली ओली माया तुटुडे म्हटले तरी तुटेना ....

कारे इतका लळा लाउनी नंतर मग हे विमान सुटते २
डोळ्यां देखत उडत जाते , आठवणींचा ठिपका होते

विमान उडले , विमानतळा वरच्या सयामच कचरा झाला .२
विमान उडले , डोळ्या मधल्या अश्रूंचा पारा फुटला
विमान उडले , डोळ्या मधल्या अश्रूंचा पारा फुटला ...

....सुधाकर .. संदर्भ ... संदीप खरे आणि सलील कुलकर्णी

Friday, March 2, 2012

नांदेड जिल्हा आणि रेल्वे - १

नांदेड जिल्हा आणि रेल्वे - १ : मुंबई मध्ये २ मार्च ला मुखमंत्री महोदय नि रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी ह्यांना निमंत्रण दिलं आणि राज्यातल्या खासदारांना पण बोलावलं असं समजलं. मग वाटलं कि आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार मिटिंग ला काय नाही जाणार आणि आपल्या मागण्या कुणी नाही मांडणार . पण असं नाही झाला हो एरवी लोकसभा आणि विधानसभे मध्ये शक्यतो गैरहजर राहणारे आणि चुकून हजर राहिलेच तर सभे मध्ये चक्क झोपा काढणारे आमचे खासदार आमदार ह्या वेळेस जरासं का होईना स्वतः ची लाज राखली असं समजलं, रेल्वे मंत्री महोदय समोर आमचे खासदार महोदय आपले मौन उघडले आणि नांदेड जिल्ह्याचे रेल्वे संभधीत काही मागण्या मांडल्या. आता ते मान्य होतील व नाही होतील ते पुढची गोष्ट.
खरच काही गोष्टी नांदेड साठी अत्यंत गरजेचे आहेत. नांदेड पुणे रोज कदाचित कमीत कमी 3००० आणि वेकेंड ला तर ५००० लोकांचं येणं जानं आहे तरी एकही रेल्वे नियमित तत्वावर नाही त्यामुळे हितं travels वाल्यांचा राज्य चाललंय. आहो मला तर वाटते हे नांदेड पुणे रेल्वे चालू करू नका म्हणून travels वाल्यांचे कुठं हफ्ते जात असावेत ह्या शिष्टमंडळ ला. पण आता ती मागणी मांडली आणि ती मागणी मान्य होण्याचे संकेत आहेत त्याच बरोबर नांदेड - बिदर चे पण काम चलू कार्नायची मागणी तसेच मुदखेड परभणी दुहेरी मार्ग ह्या तीन तरी मागण्या मान्य होण्याची संकेत आहेत. नांदेड - लातूर नवीन मार्गाचे सर्वेक्षण चं पण काम होण्याचे २५ टक्के संकेत आहेत. नांदेड जिल्ह्य चे माझे खासदार आमदार महोदायानो नांदेड जिल्ह्याचे प्रत्येक अश्या गोष्टींसाठी असेच सरकार कडे सतत पाठपुरवठा करा आणि कामं करून घ्या हि विनंती -- सुधाकर पाटील आणि समस्त नांदेड जिल्ह्याचे नागरिक
३ मार्च २०१२

Sunday, February 26, 2012

सगळेच एका माळेचे बेशरमाचे फुलं ..

सगळेच एका माळेचे बेशरमाचे फुलं .............. आताच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालीखे ची निवडणूक झाली, निवडणुकीच्या आधी प्रत्येक राजकीय पक्ष्याचे नेते मंडळी एकमेकांवर शेन फेकत होते , आरोप प्रत्यारोप करत होते. काही लोकांनी तर व्यायाक्तिक पातळीवर जाऊन शाब्दिक चिखल, शेन किंवा आणखीन काही फेकलेलं आपणच पाहिलोत ऐकलोत. पण आता निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापनेची वेळ आली तर नुसती रस्सीखेच चालू आ...हे. ज्या ज्या जागी एका पक्ष्याची एकहाती सत्ता नाही आली तिथे आधी कठोर विरोध करणाऱ्यान सोबतच युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी धावपळ चालू झाली आहे .
मला समजत नाही आम्ही सामान्य जनता ह्या सगळ्या लबाड , थोताड लोकांवर कसकाय विश्वास ठेवत आलोय आणि आजूनही ठेवतोय, आजूनही ह्यांच्या निवडणुकीच्या काळात बोललेल्या वाक्यांवर बळी पडतोय. हे लोक निवडणुकीच्या काळात येतात एकमेकांवर आरोप करतात एकून एकाचा शब्तिक बलात्कार करतात आणि पडद्या मागे मात्र एकच आसतात. म्हणजे ते एकंदरीत सगळ्या सामान्य जनतेला 'उल्लू' बनवतात आणि मुख्य म्हणजे आम्ही 'उल्लू' बनत आलो आन बनतोय.
मित्रहो मला एकच सांगायचा आहे हे सगळे नेते एकच , ह्यांना ना तुमच्या आमच्या भावनांचं काही घेणं देणं आहे कि देश्याच्या, राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या हिताचं घेणं देणं आहे... ह्यांना फक्त हवी आहे ती सत्ता मग ती कश्या प्रकारे हि मिळाली तरी चालेल. मग त्या नेत्यांच्या बोलण्या प्रमाणे तुम्ही आम्ही का वागावे ????, त्यांनी म्हटले तर नाचावे ??? आणि त्यांनी म्हटले तर पाय तोडून बसावे ??.... का का करावे असे ???.... खरच असे वाटते कि मतदान करावे तर करावे कुणाला ???... जर निवडणुकी नंतर पडलेला आणि निवडून आलेला दोघे पण एकच तर निवडून द्यावे तर कुणाला ?????????????? ...सगळे एकाच माळेचे बेशरमाचे फुलंच आसतील तर माळ वोवायची ती कशाला ....... ह्या प्रश्नांचे उत्तर मला तरी सापडत नाहीये ........... बघा तुम्हाला सपातील का ते ..............
सुधाकर पाटील
25 Feb 2012

एका लग्नाची दुसरी गोष्ट

एका लग्नाची दुसरी गोष्ट :मागच्या ३ आठवडा पासून मी एका मराठी मालिकेला follow करतोय. होय सध्या झी-मराठी वर एक मालिका येत आहे "एका लग्नाची दुसरी गोष्ट" , खूपच मस्त मालिका आहे. , एक एक पात्राची एक वेगळीच वोळख आहे, त्याचा रंग वेगळा आहे , स्वभाव वेगळा आहे मुख्य म्हणजे प्रत्येक कलाकाराने चोख कामगिरी केलेली आहे. नवीन पिढी आणि नवीन पिढी मधल्या विचारांची आणि जुन्या लोकांच्या इच्या आकांग्श्या ची नुसती गल्लत... कशी घातल्या जाते ते ह्या मालिके मध्ये दाखवलेला आहे . नवीन पिढीच्या मुलांना जुने लोक त्यांच्या प्रमाणे कसं वागवून घेतात, एकत्र कुटुंब लोक कशे आसतात, कसे वागतात हे सगळे ह्या मालिकेत पाहायला मिळेल. खरच एकत्र कुटुंब मध्ये हे असे पात्र रोज पाहायला अनुभवायला मिळतात. त्यांच्या सोबत वागताना , त्यांच्या सोबत वावरताना खूप माज्या येते. एकंदरीत एकत्र कुटुंब म्हणजे अशीच धमाल, कुठची हि धमाल करण्यासाठी कुणा बाहेर्च्याची आवशाकताच भासत नाही कारण कवयत्री कुहू घरातच असते, तर संथ ज्ञानेश्वर घरातच असतात , प्रत्येक गोष्टीवर भाषण देणारे राजकारणी व्यक्ती घरातच असते तर घरात काय चाललंय ह्याच्या कडे लक्ष नं देता आपल्याच धुन्धीत राहणारे पण घरातच आसतात. सगळ्यांना आपल्या प्रमाणे , जुन्या रूढी प्रमाणे वागणारी आणि सगळ्यांना वागवणारी 'आजी' पण घरात असते आणि एकदम नवीन विचाराने चालणारी rational निर्णय घेणारी एखादी व्यक्ती पण घरातच आसते. कुणाचाच विचार नं करता स्वतः चाच स्वार्थ साधणारी व्यक्ती घरातच असते तर दुसर्यांचा विचार करताना स्वतः ला विसरणारी, स्वतः काय हवंय हेच विसरून जाणारी 'आई' पण घरातच असते.
आणि हेच दाखवण्याचा प्रयत्न ह्या मालिके मधून केलेला आहे.मला अतिशय आवडत आहे हि मालिका ...... तुम्हास आवडली का ? ...... नाही पाहिलात तर पहा तुम्हाला पण आवडेल का ते .................
सुधाकर पाटील

Wednesday, February 1, 2012

धर्माबाद तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी काढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणणारे "गल्लीत" ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे काढता पाय करावा लागला तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल.
धर्माबाद तालुक्याचं बोलायचं झालं तर , परवाच्या नगर पालिकांच्या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धर्माबाद आणि उमरी तालुक्यांत एक तर्फी विजय मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना अभ्यास करायला पाहिजे ह्या विजयाचं नेमकं कारण काय होतं. माझ्या मता प्रमाणे ह्या भरगोस , एकतर्फी विजयाचं कारण एकच.. पक्ष्यातली एकजूट. होय पहिल्यांदा मी पहिला कि धर्माबाद तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते आपसातले भांडण सोडून आपसातले खेकड्याची चाल सोडून पक्ष्यासाठी काम केले, त्यांना काही घेणं देणं उरलेलं नव्हतं, उमेदवार कोण आहे ..... त्यांनी फक्त मेहनत घेतली ते पक्ष्यासाठी प्रतेकानी आपला अहम सोडून , गर्व सोडून काम केले आणि एकतर्फी निकाल आणला.
पण परत पालत्या घागरीवर पुन्हा पाणीच , पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याची निवडणूक आली आणि सगळ्यांची आपसात लढाई सुरु झाली. प्रत्येक जन स्वतः चच तूनतूनं हे कसं खण खण वाजतंय हे दाखवायचा प्रयत्न सुरु केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना आणि "गल्लीतल्या " नेत्यांना एकच सांगू इच्छितो , बाबानो तुम्ही आपसातल्या भांडणं मुळे , खेकडी चाल मुळे तुमची धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती गमावली आता तेच चूक परत होईल आसं मला चित्र दिसतंय ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. माननीय शरद पवार साहेबांचं पण हेच म्हणणं आहे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत राष्टवादी कॉंग्रेस च्या याश्याचं रहस्य आहे ....पक्ष्यातली एकजूट आणि जिथं कुठ अपयश आहे ते फक्त एकमेका मधल्या द्वेष मुळे किंवा स्वार्थामुळे .... तर मित्रानो विचार करा पक्ष्याशी एकजूट राहा, पक्ष्यासाठी काम करा मग पहा विजय तुमच्या कडे कसे धावत येतो ते.
धर्माबाद तालुक्याच्या कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यान बदल बोलायचा झालं तर ... धर्माबाद तालुक्याचे कॉंग्रेस नेते सध्या साम्भ्रणात आहेत , त्यांना नेमकं समजत नाहीये कि ते कॉंग्रेस चे कार्यकर्ते आहेत का नाहीयेत कारण मुळात ते कॉंग्रेस चे कार्यकर्ते नव्हेतच त्यांना जबरदस्ती ओढल्या गेलं कॉंग्रेस मध्ये. आणि म्हणून प्रत्येक जागी कॉंग्रेस च्या तिकिटावर कार्यकर्ते नाराज आहेत. हि नाराजी त्यांनी शांत बसून व्यक्त करत नाहीयेत तर त्यांनी हि नाराजी बर्याच जागी एक अपक्ष उमेदवार उभा करून व्यक्त केले. आणि मला उडत उडत हि पण गोष्ट आली कानावर हि धर्माबाद तालुक्य मध्ये कॉंग्रेस चे कार्यकर्ते पक्ष शेष्टी ला न जुमानता अपक्ष उमेदवारास निवडून आणायचा प्रयत्न चालू केलाय. एकंदरीत कॉंग्रेस चा धर्माबाद वर प्रभाव कमीच... पण त्यांना बर्याच वेळेस यश येतं त्याचं कारण मी वर सांगितला (राष्ट्रवादी कार्यकर्त्यान मधली आपसातली लढाई) .... तर बघू ह्या वेळेस divide and rule मुळे कॉंग्रेस ला धर्माबाद तालुका मध्ये पुन्हा एकदा सात मिळेल का नगर पालिका सारखा ११ खेळाडूंची दंडी उडून दारूण पराभव होईल.
आमचा कोणत्याही पक्ष्याशी संबंध जरी नसला तरी आम्हाला खूप वाईट वाटतंय कि मतदानाचा अधिकार असून सुधा ७ तारखेला आम्ही मतदान नाही करू शकत ..... म्हणूनच एकूणच हि उठाठेव.
-- सुधाकर पाटील

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी काढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणणारे गल्लीत ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे काढता पाय करावा लागला तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल.
धर्माबाद तालुक्याचं बोलायचं झालं तर , परवाच्या नगर पालिकांच्या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ला धर्माबाद आणि उमरी तालुक्यांत एक तर्फी विजय मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना अभ्यास करायला पाहिजे ह्या विजयाचं नेमकं कारण काय होतं. माझ्या मता प्रमाणे ह्या भरगोस , एकतर्फी विजयाचं कारण एकच.. पक्ष्यातली एकजूट. होय पहिल्यांदा मी पहिला कि धर्माबाद तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते आपसातले भांडण सोडून आपसातले खेकड्याची चाल सोडून पक्ष्यासाठी काम केले, त्यांना काही घेणं देणं उरलेलं नव्हतं, उमेदवार कोण आहे आणि आपला त्या उमेदवार सोबत जमत का नी ते ...... त्यांनी फक्त मेहनत घेतली ते पक्ष्यासाठी प्रतेकानी आपला अहम सोडून , गर्व सोडून काम केले आणि एकतर्फी निकाल आणला.
पण परत पालत्या घागरीवर पुन्हा पाणीच , पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याची निवडणूक आली आणि सगळ्यांची आपसात लढाई सुरु झाली. प्रत्येक जन स्वतः चच तूनतूनं हे कसं खण खण वाजतंय हे दाखवायचा प्रयत्न सुरु केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांना आणि "गल्लीतल्या " नेत्यांना एकच सांगू इच्छितो , बाबानो तुम्ही आपसातल्या भांडणं मुळे , खेकडी चाल मुळे तुमची धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समिती गमावली आता तेच चूक परत होईल आसं मला चित्र दिसतंय ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. माननीय शरद पवार साहेबांचं पण हेच म्हणणं आहे गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत राष्टवादी कॉंग्रेस च्या थोड्या बहोत याश्याचं रहस्य आहे पक्ष्यातली एकजूट आणि जिथं कुठ अपयश आहे ते फक्त एकमेका मधल्या द्वेष मुळे किंवा स्वार्थामुळे .... तर मित्रानो विचार करा पक्ष्याशी एकजूट राहा, पक्ष्यासाठी काम करा मग पहा विजय तुमच्या कडे कसे धावत येतो ते.
-- सुधाकर पाटील

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला

अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणी आपलच तूनतूनं खण खण वाजतंय म्हणून ओरडू ओरडू सांगत होता तर कुणी सहकारी आणि वरिष्ठ मंडळी जे म्हणेल ते करायला तयार म्हणून शांत बसून होता . कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी कढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणण...ारे गल्लीत ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे अपेक्ष्यान वर पाणी मरावं लागलं तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून वरिष्टांना न जुमानता अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि, कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल. बघू प्रचाराची रणधुमाळी कशी होईल, कोण कुणावर भारी पडेल , कोणाचे खिशे भरतील आणि कुणाचे खाली होतील
--- सुधाकर पाटील
Jan 30 2012