Monday, December 26, 2011

राजकारणातली घराणेशाही - थोडक्यात

कोणताही पक्ष स्थापन च्या वेळेस चे धोरण आणि विचारधारा, मग काही अनेक करणास्तव पक्ष्यात झालेले बदल, पक्ष्याने घेतलेले कलाटणी मुळे ,स्थापणे च्या वेळेस चे धोरण आणि आताचा पक्ष ह्यात खूप दुभंग निर्माण झालाय. मग आत्ता पण पक्ष्याची तीच विच्यार्धाराना असेल आसा विश्वास मी तरी नाही करणार. म्हणजे माझ्या गावात किंवा घरात कॉंग्रेस किंवा इंदिराजींचा कॉंग्रेस म्हणून आत्ता पण पंज्याला शिक्का मारणारे आहेत मग समोर रिंगणात कुणी आणि कसा का असेना. तसच एक उदारण भाजप बदल, मी लहान आसताना कदाचित मला मतदानाचा अधिकार पण नसेल तेंव्हा मी गावातल्या घरा घरात आणि माझ्या घरात विनंती केली कि विधानसभे वर कॉंग्रेस च्या उमेदवाराला ला वा कुणाला हि मतदान करा पण लोकसभे साठी आदरणीय वाजपायी साहेबाना मतदान करा (मला आमचे लोकल खासदार माहित पण नव्हते आणि निवडून आल्यावर पण कधी माहित नाही झाले :) ) . तसाच काहीं चा मत दुसर्या राजकीय पक्ष्य बदल पण आहे . सांगायचा मुद्दा म्हणजे पक्ष्याचे विचार सोज्वळ आहेत किंवा होते (होते आसच म्हणावे लागेल ) म्हणून मी आता कोणत्याही उमेदवार ला निवडून द्यायचा ??? ..... तसच घराणे शाही चं पण आहे. एखाद्या घरातले वडील लोकसभेचे किंवा विधानसभेचे सदस्य होऊन गेले, ते स्वतः कष्ट करून , लोकांच्या दुखात शामिल होऊन , लोकांचे दुख समजून समोर गेले होते पण आता त्यांचे मुलं , नातू इवेन पंतू आमदार-खासदार होतायत जे कधी सामान्य लोकांत बसलेले पण नसतात मग सामान्य लोकांचं दुख समजून घेणे आणि दुखात शामिल होणे तर सोडाच. कधी वडिलांच्या गैर हजेरीत कुणाचे लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावायला जावा लागतं तेवढाच बाकी काय माहित त्यांना कि सामान्य नागरिकांना , गरीब घरात जल्म दिलेल्या मुलांना काय दुख आसतात ते. पण नाही तरी आपण त्यांनाच पुढचे आपले युवराज घ्रहित करून ठेवतो . का ? आम्हाला पर्याय सापडत नाहीये का कुणी पर्यायी समोर येत नाहीये ? . का आणि कश्यामुळे ते आपल्याला खोधून काढावा लागेल आणि पात्र उमेदवाराला शोधून काढावा लागेल. कारण ह्या घराणे सहीचा वेल गावा गावात , प्रत्येक मतदार संघात , प्रत्येक पक्ष्यात पसरत जात आहे. का बाबा दुसरे काय पर्याय नाहीयेत कि त्यांना सोडून दुसऱ्यांत देश चालवायची क्षमताच नाहीये. ह्या आधी कि हि वेल आपले मुळ पक्की करेल त्या आधीच ह्या घराणेशाही ला उपडून फेकावा लागेल आणि एक विचारवंत उमेदवार ह्या देशाला द्यायला पाहिजे . हा आणि हाच विचार आपल्याला करायचा आहे आणि आसा विचार आपल्या सारखे विचारी लोकच करू शकतात. आणि नुसता विचार करून शांत बसायचं नाही तर विचारवंत लोकांनाच विधानसभा, लोकसभे आणि सगळ्या स्थानिक राजकीय पदावर पाठवायचं आहे.
सुधाकर पाटील
२६ डिसेंबर २०११

Friday, January 21, 2011

paraticha prawas

Pasraticha Prawas baga kasa aasato
kadhi nakosa watato tar kadhi hawa hawasa

Paraticha rasta bagha kasa aasato
kadhi kshanat sampato tar kadhi sampatach nasato

Paraticha Wel bagha kasa aasato
kadhi lavakarach jato tar kadhi jatach nasato

Sunday, October 3, 2010

कधी होईल आपल्यांना भेटणं

मासान मागून मास गेले
दिवसान मागून दिवस गेले ,
आपल्यान वाचून सगळे
आता सनं हि साजरे केले

पहिला मी तो बर्फ
बर्फाचं ते वितळणं ,
पहिली ती फ्रोझनं नायगरा नदी
पाहिलं तिचं सुसाट ते वाहणं ,
सांभाळलेला बर्फाळ दुख घेऊन
एकदाचा तिच्या erie lake ला जाऊन मिळणं

पहिली मी ती हीरवळ
झाडा वरचं हिरवं ते पानं,
पाहिलं पानाचं रंग बदलणं
मौसम नुसार त्याचं स्वतःला बदलून घेनं,
पाहिलं त्याचं ते फंधीपासून तुटनं
अन रोज दुरूनच पाहत आसलेल्या धरतीला,
एकदाचं खाली येऊन भेटणं

पहिला इथला प्रत्येक गाव
केला अख्खा अमेरिका भ्रमनं,
पण
पण न राहावे आता इथे ,
आता रमेना वेडं हे मनं,
माझ्या देहाला इथेच ठेवूनं
येतो तो रोज जुन्नी, नायेगावी फिरूनं

आसतं झोपेचं रोज रुसणं
पोटाचं तर जणू पिढ्यान पिढ्यांचं भांडण
नको वाटे हे आसं वागणं
सगळ्यांत असूनही एकटा एकटा जगणं

देवा चरणी एकच आहे विचारनं
देवा तुझ्या ह्या बाळाला सांग नं
कधी होईल आपल्यान सोबत बोलणं
बोलतांना मनसोक्त हसणं
कधी होईल आपल्यांना भेटणं
साठलेला दुख सगळं भेटता क्षणीच विसरणं

सुधाकर पाटील
तारीख : ऑक्टोंबर ३ २०१०

Thursday, September 23, 2010

बायको

आता पर्यंत मावशी , मामा , काका आत्या ह्या सगळ्या पाहुण्याच्या मुला मुलींचे लग्न लावले, मित्रांच्या लग्नामध्ये बिनधास्त नाचलो , मनसोक्त खाल्लं. नवरा नवरीच्या हसण्यावर , त्यांच्या लाजन्यावर , आपण चिडवल्या नंतर मनातून लाजून पण वरून हसण्यावर खूप हसलं. उखाण्यातून नाव घेण्यासाठी केल्याल्या आग्रह मुले परेश्यान झालेल्या नवरा - नवरी कडे पाहून स्वतः खुश
झालो. एकंदरीत दुसर्याचा लग्न म्हणजे आपली माज्याच माज्या करून घेतली . तेंवा कधी विचारही आला न्हवता कि त्या वधू वर जोडी वर किती दडपण आहे.
पण
पण जसं जसं लग्न जवळ येत माझं दडपण वाढत चाललाय . लग्न म्हणजे नेमकं काय आसतं ह्याचा मी विचार करू लागलो , आपली जोडीदार म्हणजे कोण आसते. तिच्या बद्दल आपल्या काय जबाबदाऱ्या आसतात ह्या विचारांनी दोख्यात घोड दल स्थापन केलाय. टिळा, कुंकू, लग्न, जोडीदार, बायको हे सगळे म्हणजे नेमकं काय. ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय, त्यांच्या महत्त्वाचं महत्व काय ? सगळ्या .. सगळ्या गोष्टी मला आता कुठं समजायला लागले नवे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता केल्या जात आहेत . हे गोष्टी आपापले दल करून डोक्यात आता सज्य होत आहेत. त्यातच कुठून तरी रोज एक गोष्टीचा उलघडा होत आहे , कुठून तरी आवाज येत आहे. आणि सांगत आहे अर्थ प्रत्येक गोष्टीचा. त्यातच काल एक आवाज आला ऐकण्यात आलं बायको म्हणजे काय ........... बायको म्हणजे काय असते ,

बायको म्हणजे सखी असते , बायको म्हणजे सोबती असते ,
बायको मैत्रीण असते , पण मैरिणी पेक्ष्या आई ज्यास्त असते
दिवान खाना कमी असतो पण देऊळ ज्यास्त आसतं
खरं तर बायको म्हणजे एक बंदर आसतं नवरा नावाच्या गालाबत्ता साठी
हे गलबत शिरा उभारून, निधड्या छातीने , साता समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडतं
या दर्यात शिरावं ... , दूर वरचे किनारे पहावे.......,
वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा .......,
संतप्त लाथांची मस्ती अंगावर घ्यावी ........,
ह्या दर्या च्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन जगावं ...
जगणं असं असावं कि पावुला पावुला वर मरणाशी मुलाखत व्हावी.... ,
आसं आणि ह्याहून हि कठोर निर्न्नय घेहून, दुर्दम्य इच्छेने समुद्रात जातो
पण हे सारे उद्रेक अंगावर घेत असतांना गलबत सतत पाहत असतं ते आपल्या बंदराकडे
पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव ते दोन्ही घेऊन येतं ते आपल्या बंदरामध्ये
आणि तिथ प्रशांत पायाच्या गालिच्यावर विश्रांत होतं
गलबताच्या पराक्रमाचा उत्सव हि बनदरात
त्याच्या पराभवाच्या जखमावर मलम हि बंदरातच ......

काय माहिती असे आवाज मला कुठून तरी आताच का ऐकू येत आहेत. मला वाटते अश्या आवाजाने एक एक दल साज्य होत आहेत पुढचा पावूल टाकायला मला साज्य करत आहेत.

सुधाकर पाटील
तारीख २३ सेप्टेम्बर २०१०

Sunday, August 29, 2010

मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पुन्हा एकदा जावसं वाटतं मैदानात
पुन्हा एकदा भिजावंसं वाटतं पावसात
पुन्हा एकदा खावंसं वाटतं कांदा भाजी
पुन्हा एकदा माखवसं वाटतं जिलेबी ताजी
कांदा भाजी खातांना, जिलेबी ताजी मखताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

पाणी असेल टपकत तुजया अलकांतून
खेळत असेल ते गालफटाच्या खळीतून
एक थेंब बसला असेल तुज्या ओठावर
घेशील त्यास आत, जगत असेल तो त्या आशेवर
केसांत पाणी खेळताना, ओठाशी पाणी बोलताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

वाहत आसतील धो धो पावसाच्या सरी
येत आसतील खालच्या वाड्याच्या दारी
सोडत आसशील त्यात तू कागदाच्या ओढी
करत आसतील त्या ब्राम्हदाच्या वारी
सरी दारात येताना, ओढी त्यात सोडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

इथं अंबरात कडकडत्या विजा जेन्वा थरारक जमकतात
नेमकी तुझ्या वूनिवेची जणू जाणीव करून देतात
माझ्या सारखाच आभाळाहि त्यांचा खूप राग येतो
मला समजावताना माझ्या पेक्ष्या तोच रडून निघतो
नाही होत सहन आता , बघून आक्ख अंतराळ रडताना
मला एकदा पाहावंसं वाटतं तुला पावसात भिजताना

सुधाकर पाटील
तारीख : २९ ऑगस्ट २०१०

Thursday, August 12, 2010

एक मैत्रीण !!

इथ नं मला
एक पोरगी भेटली

आधी नं जराशी
ती नाटकीच वाटली

सुरुवातीला नं ती
जरा ज्यास्तच थाटली

पण आता आमच्या दोघांची
फ्रिक्वेन्सीच पटली

पण तिच्या नाकावर
भलताच राग
चष्म्याने खाला नाकाचा
आर्धा भाग

दोन गोष्टी ती
सतत सोबत घेऊन फिरते
कुणास ठाऊक येव्हाडा वजन
नाक कसं सहन करते

आहे दिसायला
जराशी ती सावळी
पण मानाने आहे
ती खूपच हळवी

जितकी आहे ती
दिसायला बारकी
तितकीच दिसेल
तुम्हाला ती बोलकी

पण सगळ्यांनाच ती
नाही हो बोलत
सगळ्यांनाच आपलासा
नाही हो ती करत

मोजकेच तिचे मित्र आसतात
पण जे आसतात ते पक्केच बनतात

मित्र कुणाला बनवायचं ...
हक्क ह्याचा
फक्त तिलाच आहे
मी पण तिचा मित्र ...
आनंद ह्याचा
मला मात्र खूपच आहे

सुधाकर पाटील
तारीख : २६ जुलै २०१०

ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव !!

काही केल्या आता वेळ माझा पळेना
गेले कसे दोन महिने मला ते कळेना
खालील भावना तुला बोलल्याविना
चष्मा, मला आता राहवेना

गेली माझी मैत्रीण,
विचार करूनच डोकं माजं ठणकतं
गेली कुठे तुझी मैत्रीण
रोज रोज मला रोज ते विचारतं
नाहीयेस तू इथे ,
विचार करून वस्तुस्तीचा, परत भानावर येतं
माझ्याशी बोलतं आणि हळूच म्हणतं

आयुष्याच्या प्रवासात
मानसं भेटतात आणि दुरावतात देखील
नाती जुळतात आणि तुटतात देखील
ओळखी वाढतात आणि विसरतात देखील
आठवणी रंगतात आणि पुसतात देखील
मैत्री करतात आणि तोडतात देखील

पण आसे आपले म्हणणारे जेम तेमच भेटतात
बिना श्याई च्या लेखणीने आखी डायरीच लिहून काढतात
एकच आहोत आपण आसं ओराढू ओराढू सांगतात
आणि आपल्या डायरीचा एक ते भागच बनतात

त्याच डायरीतला तू एक पान बनली आहेस
जशी आहेस तशी खूप छान आहेस

जवळची मैत्रीण म्हणनार्या पैखी मला तू भेटली
थोड्याच दिवसात आपण आपली सुख दुख वाटली
आठवणी आपल्या मैत्रीचे एका कोपऱ्यात साठली
तू जाताना मात्र माझी कंठ दाठली

जाता जाता माझी एकच विनंती करतो
विनंती कसली तुझ्या समोर माझा ते हक्कच बनतो
आयुष्यात तुझ्या ह्या मित्राची हमेशा आठवण ठेव
ह्या मित्राच्या मैत्रीला कृपया तू साठउन ठेव
तुझा मित्र सुधाकर