अन अखेरीस दिवस येऊन ठेपला. होय १ महिन्या पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची धाम धूम चालू आहे. बर्याच इच्छुकांनी आपल्या इच्या पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळींकडे प्रकट केल्या होत्या. कुणी आपलच तूनतूनं खण खण वाजतंय म्हणून ओरडू ओरडू सांगत होता तर कुणी सहकारी आणि वरिष्ठ मंडळी जे म्हणेल ते करायला तयार म्हणून शांत बसून होता . कुणा नवीन इचुकाला वरिष्ट मंडळी कढनं हिरवा निशाण मिळालेला पण खाली मी मी म्हणण...ारे गल्लीत ले नेते आपल्या मुंड्या वर काढल्या मुळे त्याला काढता पाय करावा लागला तर कुणाला पक्ष्याच्या वरिष्ठ मंडळी च्या नकार मुळे अपेक्ष्यान वर पाणी मरावं लागलं तर कुणी वारीष्टांकडे आपली किंमत नाही आस म्हणून वरिष्टांना न जुमानता अपक्ष फॉम भरला. पण सामान्य जनतेला उगीचच हुरहूर लागली होती कि, कोण कोण रिंगणात उतरतील आणि कोण कोण खरे पहिलवान ठरतील आणि अखेरीस तो दिवस आला जिथून खर्या कुस्तीची सुरुवात होईल जिथून खर्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल. बघू प्रचाराची रणधुमाळी कशी होईल, कोण कुणावर भारी पडेल , कोणाचे खिशे भरतील आणि कुणाचे खाली होतील
--- सुधाकर पाटील
Jan 30 2012
Wednesday, February 1, 2012
Thursday, January 19, 2012
काल्माडीची सुटका
हा हा हा , ९ महिने तुरुंगात राहिल्या नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे माजी अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी ची जमानत झाली आणि ते तुरुंगातून सुटले तेंव्हा आपला नेता सुटला म्हणून कॉंग्रेस भवन मध्ये म्हणे फटके वाजवण्यात आले, जल्लोष झाला. एकीकडे कॉंग्रेस च्या माननीय माणिकराव ठाकरेंचं , कलमाडी हे कॉंग्रेस कडून निलंबित झालले नेते आहेत त्यांचा पक्ष्याशी काहीएक संबंद नाहीये आस बोलणं आणि त्यांच्याच पक्ष्याच्या कार्याकारंनी चक्क कॉंग्रेस भवन मध्ये जल्लोष करणं पेढे वाटणं हे काही कॉंग्रेस चं विरोधाभासी वागणं वाटत नाहीये का?? . कलमाडी ची तिहार मधून सुटका झाल्यावर कॉंग्रेस भवन मध्ये जो जल्लोष झाला तो जल्लोष कॉंग्रेस च्या नेत्यांनी जवळून पाहायला हवा होता. मला हे कळत नाहीये ... कि एक नेता जो अत्यंत मोठा भष्ट्राचार करून जो जेल मध्ये गेला होता, ज्या व्यक्तीला पक्ष्यातून निलंबित केलं गेलं त्या व्यक्ती ची आता जेल मधून सुटका झाली म्हणून त्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद का व्हावा ??. ह्याच्या वरून आम्ही हे समजायचा का कि कॉंग्रेस ला पुण्या मध्ये दुसरा नेता नाहीये आणि कलमाडी शिवाय पर्याय नाहीये आणि तसं जर असेल तर त्याच पक्ष्याचे बडे नेते का म्हणतायत कि कॉंग्रेस चा आता कलमाडी शी काहीएक संबंद नाहीये ???? . कॉंग्रेस चा कलमाडी शी सबंध हे वरून लोकांना दाखवण्यासाठी नाहीये ?? का खरच काही संबध राहणार नाहीये ??. महानगर पालेकेच्या निवडणुकी मध्ये कॉंग्रेस चा प्रचार कलमाडी (खुलेआम) करणार नाहीयेत पण मधून कलमाडी शिवाय कॉंग्रेस ला गत्यंतर नाहीये एवढं समजण्या जोगे डोकं आहे आम्हा लोकांना.
ते जावूद्या पक्ष्याचं.... पण लोकांचा ह्या मध्ये काय विचार आहे. ९ महिन्या आधी जेन्वा कलमाडी भ्रष्टाच्यारात अटकले होते तेंव्हा पुण्या मध्ये निदर्शने झाले, capian झाले फासिबूक वर तर एकदम hot topic होता , त्या लोकांची प्रतिक्रिया आज काल्माडीची सुटका झाल्यावर कशी आणि काय असेल तेच महत्वाचं आहे. आणि त्याच बरोबर मतदार बंधूला जे काही झालं त्याची जान , आठवण आहे कि सगळं काही विसरून पालथ्या घागरीवर पाणी म्हणून मतदान करणार आहेत ते आता येत्या काही दिवसच कळेल.
मला एकच सांगायचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे कि पुण्याची जनता हुशार आहे , जाणती आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आहे तेंव्हा जनतेने महानगरपलीखे च्या निवडणुकीत विचार करून मतदान करावे. कलमाडी चा भ्रष्टाचार हे उघडकीस आलं म्हणून ते भ्रष्टाचारी झाले पण असे पण नेते आसतील जे भ्रष्टाचार केले , करत आसतील पण ते उघडकीस आले नसेल मग ते कॉंग्रेस चेच असतील आसं नाहीये ते कोणत्याही पक्ष्याचे आसतील. तेंव्हा मतदार बंधू तुमचा एक मत देतांना किमान २ मिनिट विच्य्रार करा आणि मगच मतदान करा .
मला वाटते मला हे सांगायची आवशकता नाहीये कारण मतदार बंधू जानकारी आहे त्याला सर्व काही माहिती असतं तेंवा ह्या मतदार बंधू ने आपला कल कुणाकडे देईल आणि पुण्याची जहागिरी बहाल कुणाला करेल ह्याची उत्सुकता आता आम्हाला आहे.
सुधाकर पाटील
ते जावूद्या पक्ष्याचं.... पण लोकांचा ह्या मध्ये काय विचार आहे. ९ महिन्या आधी जेन्वा कलमाडी भ्रष्टाच्यारात अटकले होते तेंव्हा पुण्या मध्ये निदर्शने झाले, capian झाले फासिबूक वर तर एकदम hot topic होता , त्या लोकांची प्रतिक्रिया आज काल्माडीची सुटका झाल्यावर कशी आणि काय असेल तेच महत्वाचं आहे. आणि त्याच बरोबर मतदार बंधूला जे काही झालं त्याची जान , आठवण आहे कि सगळं काही विसरून पालथ्या घागरीवर पाणी म्हणून मतदान करणार आहेत ते आता येत्या काही दिवसच कळेल.
मला एकच सांगायचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे कि पुण्याची जनता हुशार आहे , जाणती आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आहे तेंव्हा जनतेने महानगरपलीखे च्या निवडणुकीत विचार करून मतदान करावे. कलमाडी चा भ्रष्टाचार हे उघडकीस आलं म्हणून ते भ्रष्टाचारी झाले पण असे पण नेते आसतील जे भ्रष्टाचार केले , करत आसतील पण ते उघडकीस आले नसेल मग ते कॉंग्रेस चेच असतील आसं नाहीये ते कोणत्याही पक्ष्याचे आसतील. तेंव्हा मतदार बंधू तुमचा एक मत देतांना किमान २ मिनिट विच्य्रार करा आणि मगच मतदान करा .
मला वाटते मला हे सांगायची आवशकता नाहीये कारण मतदार बंधू जानकारी आहे त्याला सर्व काही माहिती असतं तेंवा ह्या मतदार बंधू ने आपला कल कुणाकडे देईल आणि पुण्याची जहागिरी बहाल कुणाला करेल ह्याची उत्सुकता आता आम्हाला आहे.
सुधाकर पाटील
Sunday, January 15, 2012
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला !
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
... सरकार म्हणतंय फेसबुक वर
आपले विचार मांडू नका
आहो सरकारला सांगा
उगीच आम्हाला गंडवू नका
सरकार ने केलेला अन्याय
सहन आता तुम्ही करू नका
अन्याय विरुद्ध लेखणी
तुमची कधी थांबवू नका
एक जुटीने विचार
आम्हाला आता करायचा आहे
गोड गोड बोलणाऱ्या नेत्यांना
चांगलाच धडा शिकवायचा आहे
आणि म्हणूनच.......
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
सुधाकर पाटील
१५ जानेवारी २०१२
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
... सरकार म्हणतंय फेसबुक वर
आपले विचार मांडू नका
आहो सरकारला सांगा
उगीच आम्हाला गंडवू नका
सरकार ने केलेला अन्याय
सहन आता तुम्ही करू नका
अन्याय विरुद्ध लेखणी
तुमची कधी थांबवू नका
एक जुटीने विचार
आम्हाला आता करायचा आहे
गोड गोड बोलणाऱ्या नेत्यांना
चांगलाच धडा शिकवायचा आहे
आणि म्हणूनच.......
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
सुधाकर पाटील
१५ जानेवारी २०१२
Monday, January 9, 2012
Veer Shivaji on Colors Chanel
मला कळला कि colors चानेल वाले खऱ्या इतिहास ला बाजूला ठेऊन निवळ मनोरंजन म्हणून वीर शिवाजी हि मालिकेचा प्रक्षेपण करत आहेत. मला हे सुरुवातीला जेन्वा colors वर मालिका सुरु झाली तेन्वाच वाटलं होतं कि हे colors वाले ह्या मालिकेला काहीही स्वरूप देतील, इतिहास बाजूला ठेऊन मनोरंजन मालिका चा स्वरूप देतील आणि मी जर हि मालिका बघितली तर मी खरा इतिहास विसरेन म्हणून आणि म्हणूनच हि मालिका मी फक्त एक दिवस पहिली आणि आणि पुढं न पाहण्याचा निर्धार केला. मित्रांनो आम्हाला राजेंचा इतिहास मनोरंजन म्हणून नाही पहायचा तर राजेंच्या इतिहासातून काही शिकण्या साठी, शिकलेल्या इतिहासातून स्वतःला घडवण्यासाठी राजेंचा इतिहास वाचायचा , पहायचा आणि ऐकायचा आहे .... मनोरंजन साठी आहेत च कि दुसरे भरपूर मालिका....
परत एकदा मी " स्टार प्रहाव वर आलेली "राजा शिवछत्रपती" पाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण करा ... http://www.apalimarathi.com/ वर ..... आणि जर तुम्हाला वाटला कि colors वीर शिवाजी मालिके मध्ये काहीकी दाखवत आहे तर कृपया काहीही करून colors वरची "वीर शिवाजी" पाहण्यचे टाळा .. सुधाकर पाटील
परत एकदा मी " स्टार प्रहाव वर आलेली "राजा शिवछत्रपती" पाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण करा ... http://www.apalimarathi.com/ वर ..... आणि जर तुम्हाला वाटला कि colors वीर शिवाजी मालिके मध्ये काहीकी दाखवत आहे तर कृपया काहीही करून colors वरची "वीर शिवाजी" पाहण्यचे टाळा .. सुधाकर पाटील
Monday, December 26, 2011
राजकारणातली घराणेशाही - थोडक्यात
कोणताही पक्ष स्थापन च्या वेळेस चे धोरण आणि विचारधारा, मग काही अनेक करणास्तव पक्ष्यात झालेले बदल, पक्ष्याने घेतलेले कलाटणी मुळे ,स्थापणे च्या वेळेस चे धोरण आणि आताचा पक्ष ह्यात खूप दुभंग निर्माण झालाय. मग आत्ता पण पक्ष्याची तीच विच्यार्धाराना असेल आसा विश्वास मी तरी नाही करणार. म्हणजे माझ्या गावात किंवा घरात कॉंग्रेस किंवा इंदिराजींचा कॉंग्रेस म्हणून आत्ता पण पंज्याला शिक्का मारणारे आहेत मग समोर रिंगणात कुणी आणि कसा का असेना. तसच एक उदारण भाजप बदल, मी लहान आसताना कदाचित मला मतदानाचा अधिकार पण नसेल तेंव्हा मी गावातल्या घरा घरात आणि माझ्या घरात विनंती केली कि विधानसभे वर कॉंग्रेस च्या उमेदवाराला ला वा कुणाला हि मतदान करा पण लोकसभे साठी आदरणीय वाजपायी साहेबाना मतदान करा (मला आमचे लोकल खासदार माहित पण नव्हते आणि निवडून आल्यावर पण कधी माहित नाही झाले :) ) . तसाच काहीं चा मत दुसर्या राजकीय पक्ष्य बदल पण आहे . सांगायचा मुद्दा म्हणजे पक्ष्याचे विचार सोज्वळ आहेत किंवा होते (होते आसच म्हणावे लागेल ) म्हणून मी आता कोणत्याही उमेदवार ला निवडून द्यायचा ??? ..... तसच घराणे शाही चं पण आहे. एखाद्या घरातले वडील लोकसभेचे किंवा विधानसभेचे सदस्य होऊन गेले, ते स्वतः कष्ट करून , लोकांच्या दुखात शामिल होऊन , लोकांचे दुख समजून समोर गेले होते पण आता त्यांचे मुलं , नातू इवेन पंतू आमदार-खासदार होतायत जे कधी सामान्य लोकांत बसलेले पण नसतात मग सामान्य लोकांचं दुख समजून घेणे आणि दुखात शामिल होणे तर सोडाच. कधी वडिलांच्या गैर हजेरीत कुणाचे लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावायला जावा लागतं तेवढाच बाकी काय माहित त्यांना कि सामान्य नागरिकांना , गरीब घरात जल्म दिलेल्या मुलांना काय दुख आसतात ते. पण नाही तरी आपण त्यांनाच पुढचे आपले युवराज घ्रहित करून ठेवतो . का ? आम्हाला पर्याय सापडत नाहीये का कुणी पर्यायी समोर येत नाहीये ? . का आणि कश्यामुळे ते आपल्याला खोधून काढावा लागेल आणि पात्र उमेदवाराला शोधून काढावा लागेल. कारण ह्या घराणे सहीचा वेल गावा गावात , प्रत्येक मतदार संघात , प्रत्येक पक्ष्यात पसरत जात आहे. का बाबा दुसरे काय पर्याय नाहीयेत कि त्यांना सोडून दुसऱ्यांत देश चालवायची क्षमताच नाहीये. ह्या आधी कि हि वेल आपले मुळ पक्की करेल त्या आधीच ह्या घराणेशाही ला उपडून फेकावा लागेल आणि एक विचारवंत उमेदवार ह्या देशाला द्यायला पाहिजे . हा आणि हाच विचार आपल्याला करायचा आहे आणि आसा विचार आपल्या सारखे विचारी लोकच करू शकतात. आणि नुसता विचार करून शांत बसायचं नाही तर विचारवंत लोकांनाच विधानसभा, लोकसभे आणि सगळ्या स्थानिक राजकीय पदावर पाठवायचं आहे.
सुधाकर पाटील
२६ डिसेंबर २०११
सुधाकर पाटील
२६ डिसेंबर २०११
Friday, January 21, 2011
paraticha prawas
Pasraticha Prawas baga kasa aasato
kadhi nakosa watato tar kadhi hawa hawasa
Paraticha rasta bagha kasa aasato
kadhi kshanat sampato tar kadhi sampatach nasato
Paraticha Wel bagha kasa aasato
kadhi lavakarach jato tar kadhi jatach nasato
kadhi nakosa watato tar kadhi hawa hawasa
Paraticha rasta bagha kasa aasato
kadhi kshanat sampato tar kadhi sampatach nasato
Paraticha Wel bagha kasa aasato
kadhi lavakarach jato tar kadhi jatach nasato
Sunday, October 3, 2010
कधी होईल आपल्यांना भेटणं
मासान मागून मास गेले
दिवसान मागून दिवस गेले ,
आपल्यान वाचून सगळे
आता सनं हि साजरे केले
पहिला मी तो बर्फ
बर्फाचं ते वितळणं ,
पहिली ती फ्रोझनं नायगरा नदी
पाहिलं तिचं सुसाट ते वाहणं ,
सांभाळलेला बर्फाळ दुख घेऊन
एकदाचा तिच्या erie lake ला जाऊन मिळणं
पहिली मी ती हीरवळ
झाडा वरचं हिरवं ते पानं,
पाहिलं पानाचं रंग बदलणं
मौसम नुसार त्याचं स्वतःला बदलून घेनं,
पाहिलं त्याचं ते फंधीपासून तुटनं
अन रोज दुरूनच पाहत आसलेल्या धरतीला,
एकदाचं खाली येऊन भेटणं
पहिला इथला प्रत्येक गाव
केला अख्खा अमेरिका भ्रमनं,
पण
पण न राहावे आता इथे ,
आता रमेना वेडं हे मनं,
माझ्या देहाला इथेच ठेवूनं
येतो तो रोज जुन्नी, नायेगावी फिरूनं
आसतं झोपेचं रोज रुसणं
पोटाचं तर जणू पिढ्यान पिढ्यांचं भांडण
नको वाटे हे आसं वागणं
सगळ्यांत असूनही एकटा एकटा जगणं
देवा चरणी एकच आहे विचारनं
देवा तुझ्या ह्या बाळाला सांग नं
कधी होईल आपल्यान सोबत बोलणं
बोलतांना मनसोक्त हसणं
कधी होईल आपल्यांना भेटणं
साठलेला दुख सगळं भेटता क्षणीच विसरणं
सुधाकर पाटील
तारीख : ऑक्टोंबर ३ २०१०
दिवसान मागून दिवस गेले ,
आपल्यान वाचून सगळे
आता सनं हि साजरे केले
पहिला मी तो बर्फ
बर्फाचं ते वितळणं ,
पहिली ती फ्रोझनं नायगरा नदी
पाहिलं तिचं सुसाट ते वाहणं ,
सांभाळलेला बर्फाळ दुख घेऊन
एकदाचा तिच्या erie lake ला जाऊन मिळणं
पहिली मी ती हीरवळ
झाडा वरचं हिरवं ते पानं,
पाहिलं पानाचं रंग बदलणं
मौसम नुसार त्याचं स्वतःला बदलून घेनं,
पाहिलं त्याचं ते फंधीपासून तुटनं
अन रोज दुरूनच पाहत आसलेल्या धरतीला,
एकदाचं खाली येऊन भेटणं
पहिला इथला प्रत्येक गाव
केला अख्खा अमेरिका भ्रमनं,
पण
पण न राहावे आता इथे ,
आता रमेना वेडं हे मनं,
माझ्या देहाला इथेच ठेवूनं
येतो तो रोज जुन्नी, नायेगावी फिरूनं
आसतं झोपेचं रोज रुसणं
पोटाचं तर जणू पिढ्यान पिढ्यांचं भांडण
नको वाटे हे आसं वागणं
सगळ्यांत असूनही एकटा एकटा जगणं
देवा चरणी एकच आहे विचारनं
देवा तुझ्या ह्या बाळाला सांग नं
कधी होईल आपल्यान सोबत बोलणं
बोलतांना मनसोक्त हसणं
कधी होईल आपल्यांना भेटणं
साठलेला दुख सगळं भेटता क्षणीच विसरणं
सुधाकर पाटील
तारीख : ऑक्टोंबर ३ २०१०
Subscribe to:
Posts (Atom)