हा हा हा , ९ महिने तुरुंगात राहिल्या नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीचे माजी अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी ची जमानत झाली आणि ते तुरुंगातून सुटले तेंव्हा आपला नेता सुटला म्हणून कॉंग्रेस भवन मध्ये म्हणे फटके वाजवण्यात आले, जल्लोष झाला. एकीकडे कॉंग्रेस च्या माननीय माणिकराव ठाकरेंचं , कलमाडी हे कॉंग्रेस कडून निलंबित झालले नेते आहेत त्यांचा पक्ष्याशी काहीएक संबंद नाहीये आस बोलणं आणि त्यांच्याच पक्ष्याच्या कार्याकारंनी चक्क कॉंग्रेस भवन मध्ये जल्लोष करणं पेढे वाटणं हे काही कॉंग्रेस चं विरोधाभासी वागणं वाटत नाहीये का?? . कलमाडी ची तिहार मधून सुटका झाल्यावर कॉंग्रेस भवन मध्ये जो जल्लोष झाला तो जल्लोष कॉंग्रेस च्या नेत्यांनी जवळून पाहायला हवा होता. मला हे कळत नाहीये ... कि एक नेता जो अत्यंत मोठा भष्ट्राचार करून जो जेल मध्ये गेला होता, ज्या व्यक्तीला पक्ष्यातून निलंबित केलं गेलं त्या व्यक्ती ची आता जेल मधून सुटका झाली म्हणून त्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद का व्हावा ??. ह्याच्या वरून आम्ही हे समजायचा का कि कॉंग्रेस ला पुण्या मध्ये दुसरा नेता नाहीये आणि कलमाडी शिवाय पर्याय नाहीये आणि तसं जर असेल तर त्याच पक्ष्याचे बडे नेते का म्हणतायत कि कॉंग्रेस चा आता कलमाडी शी काहीएक संबंद नाहीये ???? . कॉंग्रेस चा कलमाडी शी सबंध हे वरून लोकांना दाखवण्यासाठी नाहीये ?? का खरच काही संबध राहणार नाहीये ??. महानगर पालेकेच्या निवडणुकी मध्ये कॉंग्रेस चा प्रचार कलमाडी (खुलेआम) करणार नाहीयेत पण मधून कलमाडी शिवाय कॉंग्रेस ला गत्यंतर नाहीये एवढं समजण्या जोगे डोकं आहे आम्हा लोकांना.
ते जावूद्या पक्ष्याचं.... पण लोकांचा ह्या मध्ये काय विचार आहे. ९ महिन्या आधी जेन्वा कलमाडी भ्रष्टाच्यारात अटकले होते तेंव्हा पुण्या मध्ये निदर्शने झाले, capian झाले फासिबूक वर तर एकदम hot topic होता , त्या लोकांची प्रतिक्रिया आज काल्माडीची सुटका झाल्यावर कशी आणि काय असेल तेच महत्वाचं आहे. आणि त्याच बरोबर मतदार बंधूला जे काही झालं त्याची जान , आठवण आहे कि सगळं काही विसरून पालथ्या घागरीवर पाणी म्हणून मतदान करणार आहेत ते आता येत्या काही दिवसच कळेल.
मला एकच सांगायचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे कि पुण्याची जनता हुशार आहे , जाणती आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान पण आहे तेंव्हा जनतेने महानगरपलीखे च्या निवडणुकीत विचार करून मतदान करावे. कलमाडी चा भ्रष्टाचार हे उघडकीस आलं म्हणून ते भ्रष्टाचारी झाले पण असे पण नेते आसतील जे भ्रष्टाचार केले , करत आसतील पण ते उघडकीस आले नसेल मग ते कॉंग्रेस चेच असतील आसं नाहीये ते कोणत्याही पक्ष्याचे आसतील. तेंव्हा मतदार बंधू तुमचा एक मत देतांना किमान २ मिनिट विच्य्रार करा आणि मगच मतदान करा .
मला वाटते मला हे सांगायची आवशकता नाहीये कारण मतदार बंधू जानकारी आहे त्याला सर्व काही माहिती असतं तेंवा ह्या मतदार बंधू ने आपला कल कुणाकडे देईल आणि पुण्याची जहागिरी बहाल कुणाला करेल ह्याची उत्सुकता आता आम्हाला आहे.
सुधाकर पाटील
Thursday, January 19, 2012
Sunday, January 15, 2012
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला !
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
... सरकार म्हणतंय फेसबुक वर
आपले विचार मांडू नका
आहो सरकारला सांगा
उगीच आम्हाला गंडवू नका
सरकार ने केलेला अन्याय
सहन आता तुम्ही करू नका
अन्याय विरुद्ध लेखणी
तुमची कधी थांबवू नका
एक जुटीने विचार
आम्हाला आता करायचा आहे
गोड गोड बोलणाऱ्या नेत्यांना
चांगलाच धडा शिकवायचा आहे
आणि म्हणूनच.......
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
सुधाकर पाटील
१५ जानेवारी २०१२
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
... सरकार म्हणतंय फेसबुक वर
आपले विचार मांडू नका
आहो सरकारला सांगा
उगीच आम्हाला गंडवू नका
सरकार ने केलेला अन्याय
सहन आता तुम्ही करू नका
अन्याय विरुद्ध लेखणी
तुमची कधी थांबवू नका
एक जुटीने विचार
आम्हाला आता करायचा आहे
गोड गोड बोलणाऱ्या नेत्यांना
चांगलाच धडा शिकवायचा आहे
आणि म्हणूनच.......
तीळ गुळ घ्या
गोड गोड बोला
दिलेले तीळगुळ सांडू नका
आपसात कधी भांडू नका
सुधाकर पाटील
१५ जानेवारी २०१२
Monday, January 9, 2012
Veer Shivaji on Colors Chanel
मला कळला कि colors चानेल वाले खऱ्या इतिहास ला बाजूला ठेऊन निवळ मनोरंजन म्हणून वीर शिवाजी हि मालिकेचा प्रक्षेपण करत आहेत. मला हे सुरुवातीला जेन्वा colors वर मालिका सुरु झाली तेन्वाच वाटलं होतं कि हे colors वाले ह्या मालिकेला काहीही स्वरूप देतील, इतिहास बाजूला ठेऊन मनोरंजन मालिका चा स्वरूप देतील आणि मी जर हि मालिका बघितली तर मी खरा इतिहास विसरेन म्हणून आणि म्हणूनच हि मालिका मी फक्त एक दिवस पहिली आणि आणि पुढं न पाहण्याचा निर्धार केला. मित्रांनो आम्हाला राजेंचा इतिहास मनोरंजन म्हणून नाही पहायचा तर राजेंच्या इतिहासातून काही शिकण्या साठी, शिकलेल्या इतिहासातून स्वतःला घडवण्यासाठी राजेंचा इतिहास वाचायचा , पहायचा आणि ऐकायचा आहे .... मनोरंजन साठी आहेत च कि दुसरे भरपूर मालिका....
परत एकदा मी " स्टार प्रहाव वर आलेली "राजा शिवछत्रपती" पाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण करा ... http://www.apalimarathi.com/ वर ..... आणि जर तुम्हाला वाटला कि colors वीर शिवाजी मालिके मध्ये काहीकी दाखवत आहे तर कृपया काहीही करून colors वरची "वीर शिवाजी" पाहण्यचे टाळा .. सुधाकर पाटील
परत एकदा मी " स्टार प्रहाव वर आलेली "राजा शिवछत्रपती" पाहण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण करा ... http://www.apalimarathi.com/ वर ..... आणि जर तुम्हाला वाटला कि colors वीर शिवाजी मालिके मध्ये काहीकी दाखवत आहे तर कृपया काहीही करून colors वरची "वीर शिवाजी" पाहण्यचे टाळा .. सुधाकर पाटील
Monday, December 26, 2011
राजकारणातली घराणेशाही - थोडक्यात
कोणताही पक्ष स्थापन च्या वेळेस चे धोरण आणि विचारधारा, मग काही अनेक करणास्तव पक्ष्यात झालेले बदल, पक्ष्याने घेतलेले कलाटणी मुळे ,स्थापणे च्या वेळेस चे धोरण आणि आताचा पक्ष ह्यात खूप दुभंग निर्माण झालाय. मग आत्ता पण पक्ष्याची तीच विच्यार्धाराना असेल आसा विश्वास मी तरी नाही करणार. म्हणजे माझ्या गावात किंवा घरात कॉंग्रेस किंवा इंदिराजींचा कॉंग्रेस म्हणून आत्ता पण पंज्याला शिक्का मारणारे आहेत मग समोर रिंगणात कुणी आणि कसा का असेना. तसच एक उदारण भाजप बदल, मी लहान आसताना कदाचित मला मतदानाचा अधिकार पण नसेल तेंव्हा मी गावातल्या घरा घरात आणि माझ्या घरात विनंती केली कि विधानसभे वर कॉंग्रेस च्या उमेदवाराला ला वा कुणाला हि मतदान करा पण लोकसभे साठी आदरणीय वाजपायी साहेबाना मतदान करा (मला आमचे लोकल खासदार माहित पण नव्हते आणि निवडून आल्यावर पण कधी माहित नाही झाले :) ) . तसाच काहीं चा मत दुसर्या राजकीय पक्ष्य बदल पण आहे . सांगायचा मुद्दा म्हणजे पक्ष्याचे विचार सोज्वळ आहेत किंवा होते (होते आसच म्हणावे लागेल ) म्हणून मी आता कोणत्याही उमेदवार ला निवडून द्यायचा ??? ..... तसच घराणे शाही चं पण आहे. एखाद्या घरातले वडील लोकसभेचे किंवा विधानसभेचे सदस्य होऊन गेले, ते स्वतः कष्ट करून , लोकांच्या दुखात शामिल होऊन , लोकांचे दुख समजून समोर गेले होते पण आता त्यांचे मुलं , नातू इवेन पंतू आमदार-खासदार होतायत जे कधी सामान्य लोकांत बसलेले पण नसतात मग सामान्य लोकांचं दुख समजून घेणे आणि दुखात शामिल होणे तर सोडाच. कधी वडिलांच्या गैर हजेरीत कुणाचे लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावायला जावा लागतं तेवढाच बाकी काय माहित त्यांना कि सामान्य नागरिकांना , गरीब घरात जल्म दिलेल्या मुलांना काय दुख आसतात ते. पण नाही तरी आपण त्यांनाच पुढचे आपले युवराज घ्रहित करून ठेवतो . का ? आम्हाला पर्याय सापडत नाहीये का कुणी पर्यायी समोर येत नाहीये ? . का आणि कश्यामुळे ते आपल्याला खोधून काढावा लागेल आणि पात्र उमेदवाराला शोधून काढावा लागेल. कारण ह्या घराणे सहीचा वेल गावा गावात , प्रत्येक मतदार संघात , प्रत्येक पक्ष्यात पसरत जात आहे. का बाबा दुसरे काय पर्याय नाहीयेत कि त्यांना सोडून दुसऱ्यांत देश चालवायची क्षमताच नाहीये. ह्या आधी कि हि वेल आपले मुळ पक्की करेल त्या आधीच ह्या घराणेशाही ला उपडून फेकावा लागेल आणि एक विचारवंत उमेदवार ह्या देशाला द्यायला पाहिजे . हा आणि हाच विचार आपल्याला करायचा आहे आणि आसा विचार आपल्या सारखे विचारी लोकच करू शकतात. आणि नुसता विचार करून शांत बसायचं नाही तर विचारवंत लोकांनाच विधानसभा, लोकसभे आणि सगळ्या स्थानिक राजकीय पदावर पाठवायचं आहे.
सुधाकर पाटील
२६ डिसेंबर २०११
सुधाकर पाटील
२६ डिसेंबर २०११
Friday, January 21, 2011
paraticha prawas
Pasraticha Prawas baga kasa aasato
kadhi nakosa watato tar kadhi hawa hawasa
Paraticha rasta bagha kasa aasato
kadhi kshanat sampato tar kadhi sampatach nasato
Paraticha Wel bagha kasa aasato
kadhi lavakarach jato tar kadhi jatach nasato
kadhi nakosa watato tar kadhi hawa hawasa
Paraticha rasta bagha kasa aasato
kadhi kshanat sampato tar kadhi sampatach nasato
Paraticha Wel bagha kasa aasato
kadhi lavakarach jato tar kadhi jatach nasato
Sunday, October 3, 2010
कधी होईल आपल्यांना भेटणं
मासान मागून मास गेले
दिवसान मागून दिवस गेले ,
आपल्यान वाचून सगळे
आता सनं हि साजरे केले
पहिला मी तो बर्फ
बर्फाचं ते वितळणं ,
पहिली ती फ्रोझनं नायगरा नदी
पाहिलं तिचं सुसाट ते वाहणं ,
सांभाळलेला बर्फाळ दुख घेऊन
एकदाचा तिच्या erie lake ला जाऊन मिळणं
पहिली मी ती हीरवळ
झाडा वरचं हिरवं ते पानं,
पाहिलं पानाचं रंग बदलणं
मौसम नुसार त्याचं स्वतःला बदलून घेनं,
पाहिलं त्याचं ते फंधीपासून तुटनं
अन रोज दुरूनच पाहत आसलेल्या धरतीला,
एकदाचं खाली येऊन भेटणं
पहिला इथला प्रत्येक गाव
केला अख्खा अमेरिका भ्रमनं,
पण
पण न राहावे आता इथे ,
आता रमेना वेडं हे मनं,
माझ्या देहाला इथेच ठेवूनं
येतो तो रोज जुन्नी, नायेगावी फिरूनं
आसतं झोपेचं रोज रुसणं
पोटाचं तर जणू पिढ्यान पिढ्यांचं भांडण
नको वाटे हे आसं वागणं
सगळ्यांत असूनही एकटा एकटा जगणं
देवा चरणी एकच आहे विचारनं
देवा तुझ्या ह्या बाळाला सांग नं
कधी होईल आपल्यान सोबत बोलणं
बोलतांना मनसोक्त हसणं
कधी होईल आपल्यांना भेटणं
साठलेला दुख सगळं भेटता क्षणीच विसरणं
सुधाकर पाटील
तारीख : ऑक्टोंबर ३ २०१०
दिवसान मागून दिवस गेले ,
आपल्यान वाचून सगळे
आता सनं हि साजरे केले
पहिला मी तो बर्फ
बर्फाचं ते वितळणं ,
पहिली ती फ्रोझनं नायगरा नदी
पाहिलं तिचं सुसाट ते वाहणं ,
सांभाळलेला बर्फाळ दुख घेऊन
एकदाचा तिच्या erie lake ला जाऊन मिळणं
पहिली मी ती हीरवळ
झाडा वरचं हिरवं ते पानं,
पाहिलं पानाचं रंग बदलणं
मौसम नुसार त्याचं स्वतःला बदलून घेनं,
पाहिलं त्याचं ते फंधीपासून तुटनं
अन रोज दुरूनच पाहत आसलेल्या धरतीला,
एकदाचं खाली येऊन भेटणं
पहिला इथला प्रत्येक गाव
केला अख्खा अमेरिका भ्रमनं,
पण
पण न राहावे आता इथे ,
आता रमेना वेडं हे मनं,
माझ्या देहाला इथेच ठेवूनं
येतो तो रोज जुन्नी, नायेगावी फिरूनं
आसतं झोपेचं रोज रुसणं
पोटाचं तर जणू पिढ्यान पिढ्यांचं भांडण
नको वाटे हे आसं वागणं
सगळ्यांत असूनही एकटा एकटा जगणं
देवा चरणी एकच आहे विचारनं
देवा तुझ्या ह्या बाळाला सांग नं
कधी होईल आपल्यान सोबत बोलणं
बोलतांना मनसोक्त हसणं
कधी होईल आपल्यांना भेटणं
साठलेला दुख सगळं भेटता क्षणीच विसरणं
सुधाकर पाटील
तारीख : ऑक्टोंबर ३ २०१०
Thursday, September 23, 2010
बायको
आता पर्यंत मावशी , मामा , काका आत्या ह्या सगळ्या पाहुण्याच्या मुला मुलींचे लग्न लावले, मित्रांच्या लग्नामध्ये बिनधास्त नाचलो , मनसोक्त खाल्लं. नवरा नवरीच्या हसण्यावर , त्यांच्या लाजन्यावर , आपण चिडवल्या नंतर मनातून लाजून पण वरून हसण्यावर खूप हसलं. उखाण्यातून नाव घेण्यासाठी केल्याल्या आग्रह मुले परेश्यान झालेल्या नवरा - नवरी कडे पाहून स्वतः खुश
झालो. एकंदरीत दुसर्याचा लग्न म्हणजे आपली माज्याच माज्या करून घेतली . तेंवा कधी विचारही आला न्हवता कि त्या वधू वर जोडी वर किती दडपण आहे.
पण
पण जसं जसं लग्न जवळ येत माझं दडपण वाढत चाललाय . लग्न म्हणजे नेमकं काय आसतं ह्याचा मी विचार करू लागलो , आपली जोडीदार म्हणजे कोण आसते. तिच्या बद्दल आपल्या काय जबाबदाऱ्या आसतात ह्या विचारांनी दोख्यात घोड दल स्थापन केलाय. टिळा, कुंकू, लग्न, जोडीदार, बायको हे सगळे म्हणजे नेमकं काय. ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय, त्यांच्या महत्त्वाचं महत्व काय ? सगळ्या .. सगळ्या गोष्टी मला आता कुठं समजायला लागले नवे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता केल्या जात आहेत . हे गोष्टी आपापले दल करून डोक्यात आता सज्य होत आहेत. त्यातच कुठून तरी रोज एक गोष्टीचा उलघडा होत आहे , कुठून तरी आवाज येत आहे. आणि सांगत आहे अर्थ प्रत्येक गोष्टीचा. त्यातच काल एक आवाज आला ऐकण्यात आलं बायको म्हणजे काय ........... बायको म्हणजे काय असते ,
बायको म्हणजे सखी असते , बायको म्हणजे सोबती असते ,
बायको मैत्रीण असते , पण मैरिणी पेक्ष्या आई ज्यास्त असते
दिवान खाना कमी असतो पण देऊळ ज्यास्त आसतं
खरं तर बायको म्हणजे एक बंदर आसतं नवरा नावाच्या गालाबत्ता साठी
हे गलबत शिरा उभारून, निधड्या छातीने , साता समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडतं
या दर्यात शिरावं ... , दूर वरचे किनारे पहावे.......,
वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा .......,
संतप्त लाथांची मस्ती अंगावर घ्यावी ........,
ह्या दर्या च्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन जगावं ...
जगणं असं असावं कि पावुला पावुला वर मरणाशी मुलाखत व्हावी.... ,
आसं आणि ह्याहून हि कठोर निर्न्नय घेहून, दुर्दम्य इच्छेने समुद्रात जातो
पण हे सारे उद्रेक अंगावर घेत असतांना गलबत सतत पाहत असतं ते आपल्या बंदराकडे
पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव ते दोन्ही घेऊन येतं ते आपल्या बंदरामध्ये
आणि तिथ प्रशांत पायाच्या गालिच्यावर विश्रांत होतं
गलबताच्या पराक्रमाचा उत्सव हि बनदरात
त्याच्या पराभवाच्या जखमावर मलम हि बंदरातच ......
काय माहिती असे आवाज मला कुठून तरी आताच का ऐकू येत आहेत. मला वाटते अश्या आवाजाने एक एक दल साज्य होत आहेत पुढचा पावूल टाकायला मला साज्य करत आहेत.
सुधाकर पाटील
तारीख २३ सेप्टेम्बर २०१०
झालो. एकंदरीत दुसर्याचा लग्न म्हणजे आपली माज्याच माज्या करून घेतली . तेंवा कधी विचारही आला न्हवता कि त्या वधू वर जोडी वर किती दडपण आहे.
पण
पण जसं जसं लग्न जवळ येत माझं दडपण वाढत चाललाय . लग्न म्हणजे नेमकं काय आसतं ह्याचा मी विचार करू लागलो , आपली जोडीदार म्हणजे कोण आसते. तिच्या बद्दल आपल्या काय जबाबदाऱ्या आसतात ह्या विचारांनी दोख्यात घोड दल स्थापन केलाय. टिळा, कुंकू, लग्न, जोडीदार, बायको हे सगळे म्हणजे नेमकं काय. ह्या सगळ्या गोष्टींचा नेमका अर्थ काय, त्यांच्या महत्त्वाचं महत्व काय ? सगळ्या .. सगळ्या गोष्टी मला आता कुठं समजायला लागले नवे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता केल्या जात आहेत . हे गोष्टी आपापले दल करून डोक्यात आता सज्य होत आहेत. त्यातच कुठून तरी रोज एक गोष्टीचा उलघडा होत आहे , कुठून तरी आवाज येत आहे. आणि सांगत आहे अर्थ प्रत्येक गोष्टीचा. त्यातच काल एक आवाज आला ऐकण्यात आलं बायको म्हणजे काय ........... बायको म्हणजे काय असते ,
बायको म्हणजे सखी असते , बायको म्हणजे सोबती असते ,
बायको मैत्रीण असते , पण मैरिणी पेक्ष्या आई ज्यास्त असते
दिवान खाना कमी असतो पण देऊळ ज्यास्त आसतं
खरं तर बायको म्हणजे एक बंदर आसतं नवरा नावाच्या गालाबत्ता साठी
हे गलबत शिरा उभारून, निधड्या छातीने , साता समुद्रात मुशाफिरी करायला बाहेर पडतं
या दर्यात शिरावं ... , दूर वरचे किनारे पहावे.......,
वादळ वाऱ्याशी मुकाबला करावा .......,
संतप्त लाथांची मस्ती अंगावर घ्यावी ........,
ह्या दर्या च्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन जगावं ...
जगणं असं असावं कि पावुला पावुला वर मरणाशी मुलाखत व्हावी.... ,
आसं आणि ह्याहून हि कठोर निर्न्नय घेहून, दुर्दम्य इच्छेने समुद्रात जातो
पण हे सारे उद्रेक अंगावर घेत असतांना गलबत सतत पाहत असतं ते आपल्या बंदराकडे
पराभवाच्या जखमा आणि विजयाचे उत्सव ते दोन्ही घेऊन येतं ते आपल्या बंदरामध्ये
आणि तिथ प्रशांत पायाच्या गालिच्यावर विश्रांत होतं
गलबताच्या पराक्रमाचा उत्सव हि बनदरात
त्याच्या पराभवाच्या जखमावर मलम हि बंदरातच ......
काय माहिती असे आवाज मला कुठून तरी आताच का ऐकू येत आहेत. मला वाटते अश्या आवाजाने एक एक दल साज्य होत आहेत पुढचा पावूल टाकायला मला साज्य करत आहेत.
सुधाकर पाटील
तारीख २३ सेप्टेम्बर २०१०
Subscribe to:
Posts (Atom)